शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

लोटेतील मोर्चाप्रकरणी सुमारे ४५० जणांवर गुन्हा दाखल, कशासाठी काढला होता मोर्चा.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:00 IST

असगणी ग्रामस्थांनी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होता

खेड : तालुक्यातील असगणी येथील अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीत होऊ घातलेल्या हिंदुस्तान कोकाकोला कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने असगणी ग्रामस्थांनी गुरुवारी (५ जून) तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होता. या प्रकरणी मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत सरपंच संजना संजय बुरटे, उपसरपंच यासिन फरीक घारे यांच्यासह सुमारे ४५० जणांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये प्रमोद पांडुरंग चांदिवडे, चंद्रकांत राजाराम गोसावी, सुवींद्र रामचंद्र धाडवे, शाहीन इस्माईल कादरी, रिया सचिन बाईत, मेघना भाऊ नायनाक, चेतन चंद्रकांत पवार, संजय सखाराम बुरटे, अनंत विठ्ठल नायनाक, इस्माइल हसन कादरी, हुसेन करीम ठाकुर, विवेक वासुदेव नायनाक, जावेद जब्बार आंबेडकर, रवींद्र सखाराम बुरटे, रविना रवींद्र बाईत, श्रीकांत आत्माराम फडकले, संजय आंब्रे, उस्मान हसन झगडे, गंगाराम धोंडू इप्ते, संजय तुळशीराम मोहिते यांचा समावेश आहे.

मोर्चा कशासाठी होता?ग्रामस्थांच्या रोजगाराबाबतच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आणि उपसरपंचांसह काही जणांवर केल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagitationआंदोलनCrime Newsगुन्हेगारी