शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती होऊनही ९८६ पदे रिक्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:29 IST

दोन हजार रिक्त पदे, भरती केवळ १,०६८ शिक्षकांची

रत्नागिरी : जिल्ह्यात सुमारे २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असतानाही पवित्र पोर्टलद्वारे १ हजार ६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवार अनुपस्थित राहल्याने आता केवळ १ हजार १४ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यात ९८६ पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे उर्वरित शिक्षकांची रिक्त पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासनाने शिक्षक भरती करणार हे जाहीर केल्याप्रमाणे अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त सापडला. गेली अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यातच आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्याही फार मोठी असल्याने दरवर्षी शिक्षकांच्या रिक्त पदांचा आलेख वाढत चालला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांकडून सुरू होती; तसेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणीही पालकांकडून वेळोवेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झालेला असतानाच शिक्षक भरतीचा मुहूर्त काढण्यात आला. जिल्ह्यात २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असताना १ हजार ०६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवारांनी पडताळणीला दांडी मारल्याने आता केवळ १ हजार ०१४ पदांवर भरती हाेणार आहे. त्यामुळे ९८६ पदे रिक्तच राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा रिक्त पदांचा घाेळ आहेच.

आधी बदली प्रक्रिया करावीशिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी नव्या उमेदवारांना रिक्त शाळा देण्यापूर्वी कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

संधी देऊनही उमेदवारांचे दुर्लक्षकागदपत्र तपासणीमध्ये ५५ उमेदवार विविध कारणांनी अनुपस्थित राहिले. त्यांना कागदपत्र तपासणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मुदतवाढ दिली होती; मात्र अनुपस्थितांपैकी केवळ एकच उमेदवार उपस्थित राहून कागदपत्रे सादर केली. जिल्हा परिषदेकडून संधी देऊनही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शिक्षक भरतीतील नियमांची उमेदवारांना योग्य माहिती द्यायला हवी होती. मात्र, मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाला आहे. टीईटी परीक्षेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण घेणारा उमेदवार भरतीमध्ये खुल्या प्रवर्गाचे आरक्षण घेऊ शकला. हा नियम भरतीआधी सांगितला गेला नाही. त्यामुळे स्वरूप मागासवर्गाचे मेरीट जास्त लागले. मात्र, आयुक्त यावर योग्य तोडगा काढून अन्याय दूर करतील. - संदेश रावणंग, बेरोजगार डी.एड.धारक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षकSchoolशाळा