शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती होऊनही ९८६ पदे रिक्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:29 IST

दोन हजार रिक्त पदे, भरती केवळ १,०६८ शिक्षकांची

रत्नागिरी : जिल्ह्यात सुमारे २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असतानाही पवित्र पोर्टलद्वारे १ हजार ६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवार अनुपस्थित राहल्याने आता केवळ १ हजार १४ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यात ९८६ पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे उर्वरित शिक्षकांची रिक्त पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासनाने शिक्षक भरती करणार हे जाहीर केल्याप्रमाणे अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त सापडला. गेली अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यातच आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्याही फार मोठी असल्याने दरवर्षी शिक्षकांच्या रिक्त पदांचा आलेख वाढत चालला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांकडून सुरू होती; तसेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणीही पालकांकडून वेळोवेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झालेला असतानाच शिक्षक भरतीचा मुहूर्त काढण्यात आला. जिल्ह्यात २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असताना १ हजार ०६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवारांनी पडताळणीला दांडी मारल्याने आता केवळ १ हजार ०१४ पदांवर भरती हाेणार आहे. त्यामुळे ९८६ पदे रिक्तच राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा रिक्त पदांचा घाेळ आहेच.

आधी बदली प्रक्रिया करावीशिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी नव्या उमेदवारांना रिक्त शाळा देण्यापूर्वी कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

संधी देऊनही उमेदवारांचे दुर्लक्षकागदपत्र तपासणीमध्ये ५५ उमेदवार विविध कारणांनी अनुपस्थित राहिले. त्यांना कागदपत्र तपासणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मुदतवाढ दिली होती; मात्र अनुपस्थितांपैकी केवळ एकच उमेदवार उपस्थित राहून कागदपत्रे सादर केली. जिल्हा परिषदेकडून संधी देऊनही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शिक्षक भरतीतील नियमांची उमेदवारांना योग्य माहिती द्यायला हवी होती. मात्र, मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाला आहे. टीईटी परीक्षेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण घेणारा उमेदवार भरतीमध्ये खुल्या प्रवर्गाचे आरक्षण घेऊ शकला. हा नियम भरतीआधी सांगितला गेला नाही. त्यामुळे स्वरूप मागासवर्गाचे मेरीट जास्त लागले. मात्र, आयुक्त यावर योग्य तोडगा काढून अन्याय दूर करतील. - संदेश रावणंग, बेरोजगार डी.एड.धारक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षकSchoolशाळा