शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती होऊनही ९८६ पदे रिक्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:29 IST

दोन हजार रिक्त पदे, भरती केवळ १,०६८ शिक्षकांची

रत्नागिरी : जिल्ह्यात सुमारे २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असतानाही पवित्र पोर्टलद्वारे १ हजार ६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवार अनुपस्थित राहल्याने आता केवळ १ हजार १४ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यात ९८६ पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे उर्वरित शिक्षकांची रिक्त पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासनाने शिक्षक भरती करणार हे जाहीर केल्याप्रमाणे अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त सापडला. गेली अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यातच आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्याही फार मोठी असल्याने दरवर्षी शिक्षकांच्या रिक्त पदांचा आलेख वाढत चालला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांकडून सुरू होती; तसेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणीही पालकांकडून वेळोवेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाचा बट्ट्याबाेळ झालेला असतानाच शिक्षक भरतीचा मुहूर्त काढण्यात आला. जिल्ह्यात २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असताना १ हजार ०६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवारांनी पडताळणीला दांडी मारल्याने आता केवळ १ हजार ०१४ पदांवर भरती हाेणार आहे. त्यामुळे ९८६ पदे रिक्तच राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा रिक्त पदांचा घाेळ आहेच.

आधी बदली प्रक्रिया करावीशिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी नव्या उमेदवारांना रिक्त शाळा देण्यापूर्वी कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

संधी देऊनही उमेदवारांचे दुर्लक्षकागदपत्र तपासणीमध्ये ५५ उमेदवार विविध कारणांनी अनुपस्थित राहिले. त्यांना कागदपत्र तपासणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मुदतवाढ दिली होती; मात्र अनुपस्थितांपैकी केवळ एकच उमेदवार उपस्थित राहून कागदपत्रे सादर केली. जिल्हा परिषदेकडून संधी देऊनही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शिक्षक भरतीतील नियमांची उमेदवारांना योग्य माहिती द्यायला हवी होती. मात्र, मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाला आहे. टीईटी परीक्षेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण घेणारा उमेदवार भरतीमध्ये खुल्या प्रवर्गाचे आरक्षण घेऊ शकला. हा नियम भरतीआधी सांगितला गेला नाही. त्यामुळे स्वरूप मागासवर्गाचे मेरीट जास्त लागले. मात्र, आयुक्त यावर योग्य तोडगा काढून अन्याय दूर करतील. - संदेश रावणंग, बेरोजगार डी.एड.धारक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षकSchoolशाळा