शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कोकणातून वाशी बाजारपेठेत पोहोचला उच्चांकी आंबा, मात्र खर्चही निघताना मुश्किल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:42 IST

रत्नागिरी : नैसर्गिक संकटातून वाचलेला आंबा मार्चपासून वाशी बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली. गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली. सोमवारी ...

रत्नागिरी : नैसर्गिक संकटातून वाचलेला आंबा मार्चपासून वाशी बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली. गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली. सोमवारी बाजारात १ लाख १३ हजार इतक्या आंबा पेट्या दाखल झाल्या हाेत्या.

त्यामध्ये कोकणातून या हंगामातील सर्वाधिक ८० हजार, तर अन्य राज्यांतील ३३ हजार पेट्या होत्या. मंगळवारी कोकणातून ६५ हजार आंबा पेट्या विक्रीला पाठविण्यात आल्या होत्या.यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने दर टिकून राहणे अपेक्षित होते. गतवर्षी या हंगामात ८० हजार ते ९५ हजार इतक्या आंब्याच्या पेट्या पाठविण्यात आल्या होत्या. त्याला १००० ते ३५०० रुपये इतका दर होता.

यावर्षी सोमवारी ८० हजार पेट्या आंबे पाठविण्यात आले. यावर्षीच्या या उच्चांकी आंबा पेट्या ठरल्या आहेत. तसेच मंगळवारी ६५ हजार आंबा पेट्या पाठविण्यात आल्या. या पेट्यांना १००० ते ३५०० रुपये इतकाच दर मिळाला आहे.

सध्याचे बाजारभाव इतके कमी आहेत की, खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात आणण्यासाठी केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. आंबा पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत सापडले आहेत. यावर्षी आंबा उत्पादन कमी असताना, दरही समाधानकारक नाही. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाMarketबाजार