शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रत्नागिरीत ५३ शाळा गुरुजींविनाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 03:38 IST

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ही बाब जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही डोकेदुखी ठरत आहे. त्यातच काही शिक्षकांची जिल्हाबदली तर काही शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता ५३ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २,६८८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २,५२४, तर उर्दू माध्यमाच्या १६४ शाळांचा समावेश आहे़ या शाळांमध्ये एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी अध्यापनाचे धडे गिरवत आहेत़ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येत असतानाही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ ही चिंतेची बाब आहे.जिल्हा परिषदेच्या ७०० प्राथमिक शाळांची स्थिती सध्या फार बिकट असून, त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १ ते ५ पटसंख्या असलेल्या २६७ शाळा, तर ५ ते १० पटसंख्या असलेल्या ४३३ शाळांचा समावेश आहे. ही पटसंख्या प्रत्येक शैक्षणिक वर्षात घटत चालल्याने शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही अन्य शाळांमधील शिक्षकांची नेमणूक या ठिकाणी करावी लागत आहे़ या वेळी एका शाळेतून दुसºया शाळेत जाण्यास शिक्षकही सहजासहजी तयार होत नाहीत़ मात्र, तरीही शून्य शिक्षकी शाळांमध्ये एखाद्या शिक्षकाला काही दिवस नियुक्ती देण्यात येते़ त्यामुळे शिक्षकांनाही या शाळेतून त्या शाळेत कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे़वादामुळे बदल्या रखडल्याजिल्हा परिषद शिक्षण विभागाने शून्य शिक्षकी शाळेबाबत शासनाला माहिती पाठवली आहे. सुगम, दुर्गम शाळांच्या वादामध्ये शिक्षकांच्या बदल्या रखडल्याने शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला आहे. शिक्षकांच्या बदल्यांनंतर शिक्षण विभागाकडून शून्य शिक्षकी शाळांमध्ये कायम शिक्षक देण्यात येणार होते. मात्र, बदल्यांची समस्या अद्याप न सुटल्याने शाळांवर शिक्षक मिळणे कठीण झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी