शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

रत्नागिरीत ५३ शाळा गुरुजींविनाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 03:38 IST

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ही बाब जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही डोकेदुखी ठरत आहे. त्यातच काही शिक्षकांची जिल्हाबदली तर काही शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता ५३ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २,६८८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २,५२४, तर उर्दू माध्यमाच्या १६४ शाळांचा समावेश आहे़ या शाळांमध्ये एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी अध्यापनाचे धडे गिरवत आहेत़ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येत असतानाही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ ही चिंतेची बाब आहे.जिल्हा परिषदेच्या ७०० प्राथमिक शाळांची स्थिती सध्या फार बिकट असून, त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १ ते ५ पटसंख्या असलेल्या २६७ शाळा, तर ५ ते १० पटसंख्या असलेल्या ४३३ शाळांचा समावेश आहे. ही पटसंख्या प्रत्येक शैक्षणिक वर्षात घटत चालल्याने शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही अन्य शाळांमधील शिक्षकांची नेमणूक या ठिकाणी करावी लागत आहे़ या वेळी एका शाळेतून दुसºया शाळेत जाण्यास शिक्षकही सहजासहजी तयार होत नाहीत़ मात्र, तरीही शून्य शिक्षकी शाळांमध्ये एखाद्या शिक्षकाला काही दिवस नियुक्ती देण्यात येते़ त्यामुळे शिक्षकांनाही या शाळेतून त्या शाळेत कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे़वादामुळे बदल्या रखडल्याजिल्हा परिषद शिक्षण विभागाने शून्य शिक्षकी शाळेबाबत शासनाला माहिती पाठवली आहे. सुगम, दुर्गम शाळांच्या वादामध्ये शिक्षकांच्या बदल्या रखडल्याने शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला आहे. शिक्षकांच्या बदल्यांनंतर शिक्षण विभागाकडून शून्य शिक्षकी शाळांमध्ये कायम शिक्षक देण्यात येणार होते. मात्र, बदल्यांची समस्या अद्याप न सुटल्याने शाळांवर शिक्षक मिळणे कठीण झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी