शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कंत्राटी शिक्षकांना पाच महिने वेतनाची प्रतीक्षाच, शासन थट्टा करत असल्याचा डी. एड. धारकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:22 IST

उपासमारीची वेळ आली

रत्नागिरी : रत्नागिरीजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर नेमलेल्या ५०० कंत्राटी शिक्षकांना पाच महिने उलटले तरी मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.रिक्त पदांची कसर भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने मागील वर्षी ७०० तात्पुरते शिक्षक भरले होते.मात्र, पवित्र पोर्टलवरून भरती झाल्यानंतर त्या शिक्षकांना कमी केले होते. दरम्यान, रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने सुमारे ५०० कंत्राटी शिक्षकांची भरती केली होती. मात्र, त्या कंत्राटी शिक्षकांना एक रुपयाही मानधन दिलेले नाही.

वारंवार पाठपुरावाजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर जिल्हा परिषदेने स्थानिक डी. एड. धारकांच्या कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्त्या केल्या. या शिक्षकांना ऑक्टोबर, २०२४ पासून अद्यापही मानधन दिलेले नाही. त्यासाठी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे ते पाठपुरावा करीत आहे.

तुटपुंजे मानधनजिल्हा परिषदेने या कंत्राटी शिक्षकांची तुटपुंज्या मानधनावर नियुक्ती केली आहे. त्यांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन देण्यात येते. त्या मानधनापैकी गेले पाच महिने एक रुपयाही शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे शासनाकडून डी.एड. धारकांची थट्टा सुरू असल्याचा आरोप कंत्राटी शिक्षक करत आहेत.

मानधनाची मागणीया कंत्राटी शिक्षकांचे मानधन देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून त्यांच्या मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेला आलेली नाही. त्यामुळे या कंत्राटी शिक्षकांना अद्याप मानधन मिळालेले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषदSchoolशाळाTeacherशिक्षक