शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

रत्नागिरी एमआयडीसी : हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा सुरू, नोव्हेंबर महिन्यातच घशाला कोरड

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, मिरजोळेसह परिसरातील नऊ गावच्या नळयोजनांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात एमआयडीसीने ५० टक्के कपात केली आहे. हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा कामामुळे पंधरा दिवस पाणीकपात लागू राहणार असून, त्यानंतर पूर्ववत पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, या पाणीकपातीमुळे अवलंबून असलेल्या सर्वच गावांत नळयोजनांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जॅकवेलमधील गाळ उपसा करण्यास एवढे दिवस कशासाठी लागतात? असा सवाल आता जाणकारांमधून केला जात आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून हरचेरी येथील जॅकवेलचा गाळ उपसा करण्यात येतो. मात्र, गाळ उपसा करण्याच्या नावाखाली १५ दिवसांचा घेतला जाणारा अवधी हा अधिक आहे. जे काम आठवडाभराच्या आत होऊ शकते, त्यासाठी पंधरा दिवस कशासाठी, असाही सवाल जलव्यवस्थापनातील जाणकारांकडून केला जात आहे. धरणात पुरेसा पाणीसाठी असताना तांत्रिक कारणावरून १५ दिवस पाणीकपात करण्याची आवश्यकताच नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅकवेलमधील गाळ उपसा काम कशातऱ्हेने चालते, त्यासाठी पंधरा दिवसांचा घेतला जाणारा वेळ हा योग्य आहे की कमी दिवसात हे काम करता येईल, याची पाहणी व तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. याशिवाय ग्रामपंचायतींनीही स्वत:च्या क्षेत्रात पाण्याचे अन्य स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी पर्याय म्हणून बोअरवेल्स काढणेही आवश्यक आहे. भविष्यकालीन नियोजन हवेरत्नागिरी शहर व परिसरातील अनेक गावांचे शहरीकरण जोरात सुरू आहे. गावांचा विस्तार वाढत असताना अनेक अपार्टमेंट्स उभ्या राहात आहेत. त्यामुळे लोकसंख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पालिकेने भविष्यकालीन अधिकच्या पाण्यासाठी बावनदीचे काही टक्के पाणी पालिकेसाठी राखीव करुन मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. परंतु भविष्यात रत्नागिरीसह हातखंब्यापर्यंतची गावे धरून मोठ्या शहराचा विचार होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ही मोठी गंभीर समस्या बनू पाहात आहे. त्यामुळे पालिका व सर्वच गावांनी एकत्र येऊन भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याच्या उद्भवांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठ्या नदीवरून या संपूर्ण परिसरासाठी नळपाणी योजना आराखडा तयार करण्याचीही आवश्यकता आहे. गाळ उपसा चालणार३० नोव्हेंबरपर्यंतएमआयडीसीतर्फे एमआयडीसी मिरजोळे, कुवारबाव, शिरगाव, नाचणे, मिऱ्या, कर्ला, पोमेंडी खुर्द, कारवांचीवाडी, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग यांना मिळून दररोज ९ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. सध्या गाळ उपसा सुरू असल्याने हा पुरवठा निम्मा म्हणजेच साडेचार एमएलडी एवढा केला जात आहे. १७ पासून सुरू झालेला हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा ३० पर्यंत चालणार आहे. धरणक्षेत्रात मुबलक पाणीएमआयडीसीने नळपाणी योजनांना केलेली पाणीकपात ही काही तांत्रिक कारणांमुळे (गाळ उपसा) आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही हरचेरी, निवसर, असोडे, आंजणारी, घाटीवळे या धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा आहे. पूर्ण क्षमतेने पाणी भरलेले आहे. १६.५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै २०१५ पर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा असल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता बी. एन. पाटील यांनी दिली.अनेक ग्रामपंचायतीना फटका...एमआयडीसीकडून हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा सुरू.रत्नागिरी, मिरजोळे, कुवारबाव, शिरगाव, नाचणे, कर्ला गावांचा समावेश.गाळ उपसा कामाला १५ दिवस अनावश्यक, नागरिकांच्या प्रतिक्रिया.रत्नागिरी एम्आय्डीसीकडून हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा काम सुरू आहे. या जॅकवेलमध्ये धरणक्षेत्रातील पाच ठिकाणी उभारलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये अडविलेले पाणी आणले जाते. त्यातीलच पहिल्या छायाचित्रात अंजणारी येथे व दुसऱ्या छायाचित्रात असोडे येथे अडविण्यात आलेला हा जलसाठा दिसत आहे.