शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

रत्नागिरी एमआयडीसी : हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा सुरू, नोव्हेंबर महिन्यातच घशाला कोरड

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, मिरजोळेसह परिसरातील नऊ गावच्या नळयोजनांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात एमआयडीसीने ५० टक्के कपात केली आहे. हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा कामामुळे पंधरा दिवस पाणीकपात लागू राहणार असून, त्यानंतर पूर्ववत पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, या पाणीकपातीमुळे अवलंबून असलेल्या सर्वच गावांत नळयोजनांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जॅकवेलमधील गाळ उपसा करण्यास एवढे दिवस कशासाठी लागतात? असा सवाल आता जाणकारांमधून केला जात आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून हरचेरी येथील जॅकवेलचा गाळ उपसा करण्यात येतो. मात्र, गाळ उपसा करण्याच्या नावाखाली १५ दिवसांचा घेतला जाणारा अवधी हा अधिक आहे. जे काम आठवडाभराच्या आत होऊ शकते, त्यासाठी पंधरा दिवस कशासाठी, असाही सवाल जलव्यवस्थापनातील जाणकारांकडून केला जात आहे. धरणात पुरेसा पाणीसाठी असताना तांत्रिक कारणावरून १५ दिवस पाणीकपात करण्याची आवश्यकताच नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅकवेलमधील गाळ उपसा काम कशातऱ्हेने चालते, त्यासाठी पंधरा दिवसांचा घेतला जाणारा वेळ हा योग्य आहे की कमी दिवसात हे काम करता येईल, याची पाहणी व तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. याशिवाय ग्रामपंचायतींनीही स्वत:च्या क्षेत्रात पाण्याचे अन्य स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी पर्याय म्हणून बोअरवेल्स काढणेही आवश्यक आहे. भविष्यकालीन नियोजन हवेरत्नागिरी शहर व परिसरातील अनेक गावांचे शहरीकरण जोरात सुरू आहे. गावांचा विस्तार वाढत असताना अनेक अपार्टमेंट्स उभ्या राहात आहेत. त्यामुळे लोकसंख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पालिकेने भविष्यकालीन अधिकच्या पाण्यासाठी बावनदीचे काही टक्के पाणी पालिकेसाठी राखीव करुन मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. परंतु भविष्यात रत्नागिरीसह हातखंब्यापर्यंतची गावे धरून मोठ्या शहराचा विचार होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ही मोठी गंभीर समस्या बनू पाहात आहे. त्यामुळे पालिका व सर्वच गावांनी एकत्र येऊन भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याच्या उद्भवांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठ्या नदीवरून या संपूर्ण परिसरासाठी नळपाणी योजना आराखडा तयार करण्याचीही आवश्यकता आहे. गाळ उपसा चालणार३० नोव्हेंबरपर्यंतएमआयडीसीतर्फे एमआयडीसी मिरजोळे, कुवारबाव, शिरगाव, नाचणे, मिऱ्या, कर्ला, पोमेंडी खुर्द, कारवांचीवाडी, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग यांना मिळून दररोज ९ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. सध्या गाळ उपसा सुरू असल्याने हा पुरवठा निम्मा म्हणजेच साडेचार एमएलडी एवढा केला जात आहे. १७ पासून सुरू झालेला हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा ३० पर्यंत चालणार आहे. धरणक्षेत्रात मुबलक पाणीएमआयडीसीने नळपाणी योजनांना केलेली पाणीकपात ही काही तांत्रिक कारणांमुळे (गाळ उपसा) आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही हरचेरी, निवसर, असोडे, आंजणारी, घाटीवळे या धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा आहे. पूर्ण क्षमतेने पाणी भरलेले आहे. १६.५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै २०१५ पर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा असल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता बी. एन. पाटील यांनी दिली.अनेक ग्रामपंचायतीना फटका...एमआयडीसीकडून हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा सुरू.रत्नागिरी, मिरजोळे, कुवारबाव, शिरगाव, नाचणे, कर्ला गावांचा समावेश.गाळ उपसा कामाला १५ दिवस अनावश्यक, नागरिकांच्या प्रतिक्रिया.रत्नागिरी एम्आय्डीसीकडून हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा काम सुरू आहे. या जॅकवेलमध्ये धरणक्षेत्रातील पाच ठिकाणी उभारलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये अडविलेले पाणी आणले जाते. त्यातीलच पहिल्या छायाचित्रात अंजणारी येथे व दुसऱ्या छायाचित्रात असोडे येथे अडविण्यात आलेला हा जलसाठा दिसत आहे.