शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यांत १४० अपघातात ४९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 13:04 IST

रत्नागिरी : सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात. गेल्या ४ महिन्यांत ...

रत्नागिरी : सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात. गेल्या ४ महिन्यांत जिल्हाभरात झालेल्या १४० अपघातांपैकी ४८ जीवघेण्या अपघातात ४९ जणांचा मृत्यू झाला तर ३९ गंभीर अपघातांमध्ये ९१ गंभीर झाले आहेत. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळा, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.बरेचसे अपघात वेगावरील नियंत्रण गेल्याने किंवा झोप अनावर झाल्याने होतात. वाहनचालकांमध्ये याबाबतचे प्रबोधन व्हावे, महामार्गावरील अपघात कमी व्हावेत, यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांकडून उपक्रम राबविले जात आहेत. त्याद्वारे वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहनचालकांमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे गतवर्षापासून अपघातांची संख्या घटली आहे.मात्र, काही वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काहीवेळा जीवघेणे तर काहीवेळा गंभीर, किरकोळ अपघात घडतात. वाहनचालकाला अनावर झालेली झोप, अति वेग, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, या प्रमुख कारणांमुळे अपघात होत असतात. जानेवारी ते एप्रिल २०२४ या ४ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १४० अपघात झाले. या अपघातांमध्ये ४८ जीवघेणे,९१ गंभीर आणि ८३ किरकोळ तर २० विना जखमी अपघातांचा समावेश आहे.४९ ठार, ९१ जखमीगेल्या ४ महिन्यात झालेल्या १४० अपघातांपैकी ४८ अपघातांमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित अपघातांमध्ये ९१ गंभीर तर ८३ किरकोळ जखमी झाले.

चार महिन्यांतील अपघातांची आकडेवारी अशी :

  • एकूण अपघात : १४० - मृत्यू ४९ जखमी : १७४            
  • जीवघेणे अपघात : ४८, मृत्यू : ४९
  • गंभीर अपघात : ३९, जखमी : ९१
  • किरकोळ अपघात : ३३, किरकोळ जखमी : ८३
  • विना जखमी अपघात : २०

पावसाळ्यात वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. रस्त्यांवरील सिग्नलकडे लक्ष द्यावे. पालकांनी अल्पवयीन पाल्याच्या हातात वाहन देऊ नये. दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून खबरदारी घेतल्यास नक्कीच अपघात होतील. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाहनचालकांमध्ये प्रबोधन करण्यात येत असल्याने अपघात कमी झाले आहेत तसेच मृत्यूची संख्याही घटली आहे. वाहनचालकांनी वाहन जपून चालवावे. - फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू