शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

रत्नागिरी जिल्ह्यात चार महिन्यांत १४० अपघातात ४९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 13:04 IST

रत्नागिरी : सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात. गेल्या ४ महिन्यांत ...

रत्नागिरी : सध्या वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात. गेल्या ४ महिन्यांत जिल्हाभरात झालेल्या १४० अपघातांपैकी ४८ जीवघेण्या अपघातात ४९ जणांचा मृत्यू झाला तर ३९ गंभीर अपघातांमध्ये ९१ गंभीर झाले आहेत. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळा, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.बरेचसे अपघात वेगावरील नियंत्रण गेल्याने किंवा झोप अनावर झाल्याने होतात. वाहनचालकांमध्ये याबाबतचे प्रबोधन व्हावे, महामार्गावरील अपघात कमी व्हावेत, यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांकडून उपक्रम राबविले जात आहेत. त्याद्वारे वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहनचालकांमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे गतवर्षापासून अपघातांची संख्या घटली आहे.मात्र, काही वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काहीवेळा जीवघेणे तर काहीवेळा गंभीर, किरकोळ अपघात घडतात. वाहनचालकाला अनावर झालेली झोप, अति वेग, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, या प्रमुख कारणांमुळे अपघात होत असतात. जानेवारी ते एप्रिल २०२४ या ४ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १४० अपघात झाले. या अपघातांमध्ये ४८ जीवघेणे,९१ गंभीर आणि ८३ किरकोळ तर २० विना जखमी अपघातांचा समावेश आहे.४९ ठार, ९१ जखमीगेल्या ४ महिन्यात झालेल्या १४० अपघातांपैकी ४८ अपघातांमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित अपघातांमध्ये ९१ गंभीर तर ८३ किरकोळ जखमी झाले.

चार महिन्यांतील अपघातांची आकडेवारी अशी :

  • एकूण अपघात : १४० - मृत्यू ४९ जखमी : १७४            
  • जीवघेणे अपघात : ४८, मृत्यू : ४९
  • गंभीर अपघात : ३९, जखमी : ९१
  • किरकोळ अपघात : ३३, किरकोळ जखमी : ८३
  • विना जखमी अपघात : २०

पावसाळ्यात वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. रस्त्यांवरील सिग्नलकडे लक्ष द्यावे. पालकांनी अल्पवयीन पाल्याच्या हातात वाहन देऊ नये. दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून खबरदारी घेतल्यास नक्कीच अपघात होतील. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाहनचालकांमध्ये प्रबोधन करण्यात येत असल्याने अपघात कमी झाले आहेत तसेच मृत्यूची संख्याही घटली आहे. वाहनचालकांनी वाहन जपून चालवावे. - फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू