शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack: रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ पर्यटक सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:23 IST

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील ४२ पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरूप व सुरक्षित आहेत. ...

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील ४२ पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरूप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात सातत्याने आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे.पहलगाम येथील बैसरन खोरे परिसरात मंगळवार, २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने जिल्ह्यातील अनेक पर्यटक जम्मू-काश्मीर येथे गेलेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने त्यांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. रत्नागिरीतील साक्षी संदीप पावसकर (२६) आणि रुचा प्रमोद खेडेकर (२१) या सिंधुदुर्गातील सहा नातेवाइकांसोबत २० एप्रिलला काश्मीर येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. २३ रोजी रात्री त्या मुंबईत आल्या.रत्नागिरीनजीकच्या शिरगाव येथील खलिफ मुकादम व सहा कुटुंब सदस्य २० रोजी ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. हे सर्व पर्यटक श्रीनगर येथे हॉटेलमध्ये सुखरूप असून, दि. २५ एप्रिल रोजी विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत.रत्नागिरी येथील मनोज जठार, अनुश्री जठार व इतर ३२, असे एकूण ३४ सदस्य २१ रोजी ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत रत्नागिरीमधून काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. सर्व पर्यटक कतार, जम्मू येथे सुखरूप आहेत. २४ एप्रिल रोजी ते रेल्वेने दिल्लीत येणार असून, २६ एप्रिल रोजी रत्नागिरीत पोहोचणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षामधून सर्व पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सर्व जण सुखरूप आणि सुरक्षित आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने पर्यटकांशी संपर्कपहलगाम येथील हल्ल्याबाबत मंगळवारी जिल्हा नियंत्रण कक्षात वृत्त धडकताच लागलीच सर्वत्र संपर्क सुरू झाला. ज्यांचे नातेवाईक पर्यटनासाठी तिकडे गेले होते, त्यांची नावे कळवावीत, असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स कंपनींना फोन करून त्यांच्याकडून गेलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांची नावे व ते कुठे आहेत, ही सर्व माहिती घेतली जात होती. बुधवारीही जिल्हा नियंत्रण कक्षाकडून श्रीनगर येथील प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाtourismपर्यटन