शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रत्नागिरी जिल्ह्यातील ३.६८ टक्के पाणी दूषित, कोणत्या तालुक्यात स्वच्छ आहे पाणी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:43 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासण्यात आलेल्या ३३६ पाणी नमुन्यांपैकी १२ नमुने प्रयोगशाळेत दूषित आले आहेत. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासण्यात आलेल्या ३३६ पाणी नमुन्यांपैकी १२ नमुने प्रयोगशाळेत दूषित आले आहेत. या अहवालानुसार जिल्ह्यातील ३.६८ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ६ तालुक्यातील पाण्याचा एकही नमुना दूषित नसल्याने या तालुक्यातील पाणी स्वच्छ आहे.दूषित पाण्यामुळे कावीळ, अतिसार, गॅस्ट्रो आदी साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाणी स्रोतांचे नमुने घेतले जातात. त्या नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात येते. नमुना दूषित आल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला नाही.

३३६ पाणी नमुन्यांपैकी १२ नमुने दूषितगोळा केलेल्या ३३६ पाणी नमुन्यांपैकी १२ नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये चिपळूण, गुहागर, खेड या तालुक्यातील पाणी नमुने दूषित आले आहेत. तर मंडणगड, दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यात एकही नमुना दूषित आढळलेला नाही.

पाणी दूषित का हाेते?पाण्याचा अति उपसा, कारखान्यातील पाणी प्रक्रिया न करता सोडणे, घरगुती घनकचरा व सांडपाणी, टाकाऊ पदार्थ जमिनीवर टाकणे व पुरणे, रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर, उघड्यावरील विष्ठा पाण्यात मिसळणे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीpollutionप्रदूषण