शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

तब्बल २४९ नळपाणी योजना नादुरूस्त, हवेत १२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:13 IST

zp ratnagiri-यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २४९ नळपाणी पुरवठा योजनांसाठी १२ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा आराखडा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांचा तयार करण्यात आला असून तो जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणाची तयारी सुरू साडेसोळा कोटींचा आराखडा तयार

रत्नागिरी : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २४९ नळपाणी पुरवठा योजनांसाठी १२ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा आराखडा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांचा तयार करण्यात आला असून तो जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र सातत्याने पाणीटंचाई होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपाची उपाययोजना करण्याकडे लक्ष दिले जात नाही. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने पाणीटंचाई उशिरा उद्भवण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळीही अजून तरी स्थिर आहे.कोरोनामुळे शासनाची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने राष्ट्रीय पेयजल योजनेचा निधी जिल्हा परिषदेला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक पाणी पुरवठ्याच्या योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पडून आहेत. त्यांचा समावेश आताच्या आराखड्यात करण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भामुळे बैठका उशिरा झाल्याने काही तालुक्यांचे आराखडे विलंबाने सादर झाले. त्यामुळे यंदाचा आराखडा तयार करण्यास उशीर झाला आहे. तरीही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने धावपळ करुन हा आराखडा तयार केला. गेल्या वर्षीपेक्षा १ कोटी रुपयांनी हा आराखडा जादा आहे.यंदाचा आराखड्यानुसार ४६५ गावातील ७४७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. यावर्षी विंधन विहिरींच्या दुरुस्तीची कामे घेण्यात आलेली नाहीत. मात्र, १९८ गावांतील २८० वाड्यांमध्ये नवीन विंधन विहिरी खोदणे प्रस्तावित आहे. त्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ६ गावातील ९ वाड्यांतील विहिरी खोल करणे व गाळ काढण्यासाठी १५ लाख रुपये, तात्पुरत्या पूरक नळपाणी योजनांसाठी १ कोटी २० लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच यंदा ६८ गावातील १५३ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यांना २५ टँकरने पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी ३३ लाख ७९ हजार रुपये खर्च होणार आहे. मात्र, यंदा एकही खासगी विहिरीचे अधिग्रहण करावे लागणार नाही, अपेक्षित धरले जात आहे.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यंदाच्या टंचाई आराखड्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीवर जास्त भर दिला आहे. तरीही जिल्हा प्रशासन हा आराखडा मंजूर करताना किती रकमेच्या आराखड्याला मंजुरी देते, यावरही ही दुरुस्तीची कामे अवलंबून आहेत. पाणीटंचाई निवारण आराखड्यामध्ये गतवर्षीप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून कोणते बदल करण्याची सूचना देण्यात येते, याकडेही जिल्हा परिषदेचे लक्ष लागून राहिले आहे.आराखडा सादरगतवर्षी टंचाई कृती आराखडा सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यामध्ये बदल करण्यासाठी दोन वेळा जिल्हा परिषदेकडे माघारी पाठविला होता. यंदाचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडे नुकताच सादर करण्यात आला असून त्याच्या मंजुरीसाठी किती वेळ जाणार याकडे लक्ष लागले आहे.आठ कोटी रखडलेकोरोनामुळे गतवर्षीच्या टंचाई कृती आराखड्याच्या निधीला बसला होता. त्यामुळे गतवर्षीच्या आराखड्यातील ८ कोटी रुपये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला अजूनही प्राप्त झालेले नाहीत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी