शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

रत्नागिरी जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 6:52 PM

child ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके असून, त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. मात्र, अनुदान नसल्याने हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालकेअतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बाल विकास केंद्र सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके असून, त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. मात्र, अनुदान नसल्याने हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे जनतेसाठी विविध योजना राबविताना शासनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक योजनांचा निधी कपात करण्यात आल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या महिला व विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कुपोषित बालकांच्या पोषण आहार योजनेला बसला आहे.मागील वर्षभरात ० ते ६ वयोगटांतील ८१,८०१ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ७४,०३३ मुले सर्वसाधारण वजनाची आणि मध्यम वजनाची ६,३८८ मुले आहेत. मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४५७ असून, तीव्र कुपोषित बालके २२ आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील चार बालके, दापोलीतील ५, रत्नागिरी ४, राजापुरात २ आणि चिपळूण, खेडमधील एका बालकाचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक कमी वजनाची बालके गुहागर तालुक्यात आहेत.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषित बालकांवर लक्ष ठेवण्यात येते. मात्र निधीअभावी पोषण आहाराचे नियोजन गावपातळीवर करण्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत. हा खर्च अंगणवाडी सेविकांना शासनाकडून नंतर देण्यात येणार आहे. मात्र, अल्प मानधनावर काम करणाऱ्या या अंगणवाडीसेविका खर्च कुठून करणार? हा प्रश्न आहे.कोरोनामुळे निधी नाहीया बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण बालविकास केंद्रासाठी १५०० रुपये दिले जातात. त्यात ९०० रुपये पोषण आहारासाठी आणि उर्वरित ६०० रुपये औषधे, अंगणवाडी सेविकांचा खर्च यावर केला जातो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निधी आलेला नाही.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी