शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी रत्नागिरीला १ कोटीचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:54 IST

चार ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील चार ठिकाणांच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी १ काेटी ५ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, चार ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.

राज्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनाने २७० कोटी ४८ लाख १२ हजार एवढ्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यापैकी ८९ कोटी ४९ लक्ष १९ हजार एवढा निधी राज्यातील संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे वितरित केला आहे. यापैकी रत्नागिरीसाठी मंजूर झालेल्या ५ कोटींपैकी १ कोटी ५ लाखांचा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या निधीतून रत्नागिरी तालुक्यातील रत्नदुर्ग किल्ला, भाट्ये समुद्रकिनारा, आरे - वारे समुद्रकिनारा आणि श्रीक्षेत्र पावस या चार ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

रत्नागिरीतील चार ठिकाणांचा समावेश

रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी

रत्नागिरीनजीकच्या रत्नदुर्ग किल्ला येथील उद्यानात शिवसृष्टी विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी या योजनेंतर्गत २ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी ३० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

भाट्ये किनारीही होणार अनेक कामे

भाट्ये किनारी मूलभूत सुविधांसाठी १ कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यात जोडरस्ता तयार करणे, पार्किंग सुविधा, स्वच्छतागृहे व अन्य सुविधा, बेंचेस, विद्युत पुरवठा आदी कामांचा समावेश आहे. मंजूर निधीपैकी सध्या २५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

पर्यटकांचे आकर्षण : आरेवारे किनारा

आरे वारे समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणामुळे गणपतीपुळे येथे जाण्यासाठी येणारे पर्यटक येता-जाताना आरे वारे येथील समुद्रकिनाऱ्यावर थांबत आहेत. या पायाभूत सुविधांसाठी १ कोटीचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी २५ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे वितरित करण्यात आले आहेत.

श्री क्षेत्र पावसचे सुशाेभीकरण

श्री क्षेत्र पावस परिसराचे सुशाेभीकरण, संरक्षण भिंत, घाट बांधणे तसेच पर्यटकांसाठी सुलभ शाैचालय आदी विकासकामांचा समावेश आहे. यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी २५ लाखांचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन