शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'RSS आणि BJP लोकांना भडकवतात अन् दंगली घडवतात', अशोक गहलोत यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:10 IST

काँग्रेस सत्तेत आल्यावर द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घालू- कमलनाथ

Rajasthan Politics: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी RSS आणि भाजपवर मोठा आरोप केला. जालोर सर्किट हाऊस येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि RSS दंगली घडवतात. धर्माच्या नावाखाली ते लोकांना भडकवतात. भाजपवाले गायीचे राजकारण करतात, आम्ही गायींच्या नावावर कधीच मत मागत नाही. मग आम्ही हिंदू नाहीत का?, असा सवाल त्यांनी केला.

अशोक गेहलोत पुढे म्हणाले की, राममंदिराच्या राजकारणासाठी काही लोक हिंदू झाले आहेत, असे ते म्हणतात. मूळात त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नव्हता. हिंदू धर्म न मानणारे लोक राजकारणासाठी हिंदू झाले. राजस्थानमध्ये आम्ही भाजपचा हा हुंदुत्वाचा अजेंडा चालू देणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस सत्तेत आल्यावर त्या संघटनांवर बंदी घालणार-कमलनाथतिकडे, मध्य प्रदेशकाँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी बजरंग दलावरील बंदीबाबत वक्तव्य केले आहे. शाजापूरमध्ये कमलनाथ म्हणाले की, मध्य प्रदेशात द्वेष पसरवणाऱ्या कोणत्याही पक्षावर बंदी घालू. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. बजरंग दल असो वा अन्य कोणताही पक्ष. जो कोणी समाज आणि देशामध्ये फूट पाडण्याचे आणि द्वेष पसरवण्याचे काम करेल, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्या संघटनेवर बंदी घालेल.

इंदूरमधील बजरंग दलावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आम्ही समर्थन करतो. पण, काँग्रेसच्या सांगण्यावरुन पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष बजरंग दलाच्या विरोधात नाही, पण जे राज्याची शांतता बिघडवतात किंवा द्वेष पसरवतात, त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ