शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपने भाकरी फिरविली; आता आव्हान लोकसभेचे, कमळाचा विजयरथ रोखणार का हात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2024 10:21 IST

लोकसभा निवडणुकीत २५ जागा राखण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. 

विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीतील १५ उमेदवार हे राजस्थानमधील आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व २५ जागांवर भाजपचा विजय झाला होता. यंदा या जागा कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. तर, भाजपचा विजयरथ रोखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करत भाकरी फिरविली खरी; पण, आता लोकसभा निवडणुकीत २५ जागा राखण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. 

राजस्थानमधून भाजपने ज्या प्रमुख उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे, त्यांत अर्जुन राम मेघवाल (बिकानेर), भूपेंद्र यादव (अलवर), गजेंद्र सिंह शेखावत (जोधपूर), कैलाश चौधरी (बाडमेर), ओम बिरला (कोटा) यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानात भाजपने विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली.

काँग्रेसची छोट्या पक्षांसोबत आघाडी

छोट्या पक्षांसोबत आघाडी करून काँग्रेस ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात भाकप, भारतीय आदिवासी पार्टी आणि हनुमान बेनिवाल यांच्याशी काँग्रेसची चर्चा सुरू आहे व त्यावर शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतही भारतीय आदिवासी पार्टीने आदिवासी जागांवर काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता; पण काँग्रेसने ते मान्य केले नाही आणि बहुतांश आदिवासी जागांवर भाजपने निवडणूक जिंकली होती. ही चूक आता सुधारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहे. 

लोकसभेला सलग दोनदा काँग्रेसचा पराभव 

लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ अशा दोन निवडणुकांत राजस्थानात काँग्रेसला यश मिळविता आलेले नाही. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राजस्थानात सत्ता मिळविली होती. अशोक गेहलोत यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविले. तथापि, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली आणि भजनलाल शर्मा मुख्यमंत्री झाले.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस