शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:03 IST

बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्ताकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे."

ब्रिटिश इतिहासकारांच्या सुरुवातीच्या प्रभावामुळे, भारतीय इतिहासात अनेक चुकीच्या गोष्टी नोंदवल्या गेल्या. यात जोधाबाई आणि मुघल सम्राट अकबर यांच्या लग्नाच्या कहाणीचाही समावेश आहे. एवढेच नाही तर, अकबरनाम्यात जोधा-अकबर लग्नाचा कसलाही उल्लेख नाही, असा दावाही राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. ते बुधवारी सायंकाळी उदयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्तकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे. भारमल नावाचा एक राजा होता आणि त्याने एका दासीकन्येचे लग्न अकबराशी लावून दिले होते."

बागडे पुढे म्हणाले, "इंग्रजांनी आपल्या नायकांचा इतिहास विकृत केला. त्यांनी तो इतिहास व्यवस्थित लिहिला नाही आणि सुरुवातीला त्यांनी लिहिलेला इतिहास खरा मानला गेला. मात्र नंतर, काही भारतीयांनी इतिहास लिहिला, पण तरीही त्यावर ब्रिटिशांचा प्रभाव होता."

'महाराणा प्रतापांसंदर्भात कमी शिकवलं जातं...'यावेळी राज्यपाल बागडे यांनी, राजपूत शासक महाराणा प्रताप यांनी अकबराला तहासाठी पत्र लिहिले होते, या एतिहासिक दाव्यांचेही खंडण केले. हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचेही ते म्हणाले. तसेच, "महाराणा प्रताप यांनी कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. इतिहासात अकबराबद्दल अधिक आणि महाराणा प्रतापांबद्दल कमी शिकवले जाते," असेही बागडे म्हणाले.

तथापि, "आता परिस्थिती सुधारत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपली संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपून भविष्यातील आव्हानांसाठी नवीन पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असेही बागडे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajasthanराजस्थानEducationशिक्षण