शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

काँग्रेसला 60 वर्षांत अशी एकही आदिवासी व्यक्ती मिळाली नाही, जी देशाची राष्ट्रपती बनू शकेल; PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 21:28 IST

"भारतीय जनता पक्ष (भाजप) गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. मात्र, काँग्रेसच्या दुकानात भय, भूक आणि भ्रष्टाचारच विकला जातो, असेही मोदी म्हणाले."

आदीवासी कल्ल्यानाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाला आपल्या 60 वर्षांच्या शासन काळात आदिवासी समाजातून येणारी अशी एकही व्यक्ती मिळाली नाही, जी देशाची राष्ट्रपती बनू शकेल. एवढेच नाही, तर भारतीय जनता पक्ष (भाजप) गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. मात्र, काँग्रेसच्या दुकानात भय, भूक आणि भ्रष्टाचारच विकला जातो, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी आज बांसवाडा येथे भाजप उमेदवार महेंद्रजीत मालवीय यांच्या समर्थनार्थ एका प्रचार सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, ”आदिवासी समाजात क्षमता नव्हती का? जरा काँग्रेसच्या मानसिकतेचा विचार करा. 2014 मध्य आपण या सेवकाला आर्शीवाद दिला. आज या देशाची प्रथम नागरिक, देशाची राष्ट्रपती, आदिवासी समाजातील एक मुलगी आहे. हीच खरी भागीदारी आहे.”

मोदी म्हणाले, तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पहिल्यांदाच आदिवासी समाजासाठी एक स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले. स्वतंत्र बजेट तयार केले होते. कोट्यवधी आदिवासी मुलं अणि मुलींपैकी काँग्रेसला 60 वर्षांत असं कुणीही मिळालं नाही जे देशाचा राष्ट्रपती बनू शकेल?”

“आज भारतात स्थिर आणि मजबूत सरकार असणे अत्यंत आवश्यक आहे. एक असे सरकार, जे सीमांचे संरक्षण करू शकेल आणि गरज पडल्यास, पाताळातूनही शत्रू शोधून त्याचा नाश करू शकेल. एवढेच नाही तर, देशाला एका अशा सरकारची आवश्यकता आहे, जे महिला, शेतकरी, गरीब, वंचित, आदिवासी आणि मागास, अशा सर्वच घटकांना सन्मान आणि समृद्धीकडे घेऊन जाईल, असेही मोदी म्हणाले." 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा