शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

“...तर राजस्थानमध्ये काँग्रेसचे काही खरे नाही”; अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 17:56 IST

CM Ashok Gehlot On Rajasthan Assembly Election Result 2023: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीन कारणे सांगितली आहेत.

CM Ashok Gehlot On Rajasthan Assembly Election Result 2023: देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये राजस्थानचा समावेश आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात कडवी टक्कर होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ०३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

एक्झिट पोल काहीही सांगत असले तरी राजस्थानमध्ये काँग्रेसच सरकार स्थापन करेल. भाजप ५ पैकी एकाही राज्यात विजयी होणार नाही. राजस्थानची जनता काँग्रेसला पुन्हा एकदा संधी देईल आणि आमचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करताना, याची तीन कारणे अशोक गेहलोत यांनी सांगितली. पहिले कारण म्हणजे काँग्रेसविरोधात किंवा आमच्या सरकारविरोधी लाट नाही, असेही जाणकार सांगत आहेत. दुसरा म्हणजे मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनी विकासकामे करण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही, असे भाजपचे मतदारही म्हणतील. तिसरी म्हणजे पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी प्रचारादरम्यान ज्या भाषेचा वापर केला ती कोणालाही आवडलेली नाही, असे अशोक गेहलोत यांनी नमूद केले. 

...तर राजस्थानमध्ये काँग्रेसचे काही खरे नाही

निवडणुकीत भाजपने धर्माच्या नावाखाली भीतीदायक आणि तणावपूर्ण गोष्टी पसरवल्या आहेत. भाजपचे धर्माचे कार्ड चालले तर वेगळी बाब आहे. मग काही खरे नाही. भाजपचे धार्मिक कार्ड चालले नाही तर सरकार स्थापन करू, असा विश्वास अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला. तसेच सर्वेक्षणांमध्ये काही आले तरी राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. भाजप नेते लोकांसमोर सूडबुद्धीची भाषा बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला. 

दरम्यान, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला विधानसभेच्या २०० जागांसाठी मतदान झाले होते. राजस्थानमध्ये गेल्या ३० वर्षांपासून प्रत्येक वेळी सरकार बदलण्याचा ट्रेंड आहे. १९९३ मध्ये भाजपने येथे विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. ५ वर्षानंतर २००३ मध्ये जनतेने पुन्हा भाजपला विजय मिळवून दिला. यानंतर २००८ मध्ये काँग्रेस, २०१३ मध्ये भाजप आणि २०१८ मध्ये काँग्रेस विजयी झाली. राजस्थानमध्ये तीस वर्षांपासून सुरू असलेला ट्रेंड यावेळीही कायम राहणार की बदलणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतBJPभाजपाcongressकाँग्रेस