शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

राजस्थानात प्रचार टीपेला; आदिवासींच्या अधिकारावरुन एकमेकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 06:33 IST

प्रमुख मुद्दे : लाल डायरी, आदिवासींचे अधिकार अन् जातीय जनगणना

जल, जंगल व जमिनीचे गैरव्यवहार उलगडणार

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : सध्या राजस्थानमध्ये लाल डायरीची जोरात चर्चा सुरू होणार आहे. डायरीतील पाने जसजशी उलगडत जात आहेत, तसतसे जादूगाराच्या चेहऱ्यावरील तेज हरपत चालले आहे. 

काँग्रेसने पाच वर्षांत राज्यातील जल, जंगल आणि जमीन कोणाला कशी विकली, हे डायरीत स्पष्टपणे लिहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली. राजस्थानच्या अंता येथील प्रचारसभेला मोदी यांनी संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही विकसित देशाचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. राजस्थानचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. परंतु मागील ५ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राजस्थान पीछाडीवर गेले आहे. 

तुमचे स्वप्न, माझा संकल्पnराज्यात भाजपचे सरकार आल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. विकसित राज्याचे तुमचे स्वप्न हे मोदींचा संकल्प आहे. nविविध कल्याणकारी योजनांपासून राज्यातील कुणीही वंचित राहणार नाही. तुम्हाला लुटणारा भ्रष्टाचारी वाचणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

देशाच्या विकासात भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण हे तीन प्रमुख अडथळे आहे, परंतु काँग्रेस सरकार त्याशिवाय कामच करू शकत नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

जल, जंगल व जमिनीचे हक्क मिळवून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : आदिवासींच्या अधिकार आणि हक्कासाठी केवळ काँग्रेस पक्षच कटिबद्ध आहे. जोपर्यंत काँग्रेस आहे, तोपर्यंत त्यांच्या अधिकारांचे रक्षण करू. आदिवासींच्या मुलांना शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा दिली जाईल. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देणार, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उदयपूर येथील प्रचारसभेत दिले.राहुल गांधी म्हणाले, एखाद्या जातीचे देशात किती प्रमाण आहे, ते कळालेच नाही तर त्यांचे अधिकार, विकासातील वाटा, याबाबत कसे कळणार? जात जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे. काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात तसेच केंद्रातही काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात जात जनगणना केली जाईल.

भाजपचे इंजिन हाेणार फेल : सचिन पायलटnकाॅंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी कामा येथील एका प्रचारसभेत भाजपचे इंजिन फेल हाेतील, असा दावा करुन जाेरदार टीका केली. nभाजपकडून नेहमी डबल इंजिन सरकारचा दावा केला जाताे. हा दावा कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात फसला आहे. आता राजस्थान आणि मध्य प्रदेशातही फेल हाेईल, असे पायलट म्हणाले.

उत्तराखंडमध्ये मजूर बाेगद्यात अनेक दिवसांपासून अडकले आहेत. परंतु, प्रसार माध्यमांमध्ये २४ तास फक्त क्रिकेटबद्दल बाेलले जात आहे. चांगले आहे का? दाेन मिनिटे आमच्या कामगारांना तर द्या, असे सांगून राहुल गांधी यांनी या घटनेकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीprime ministerपंतप्रधान