शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिमेंट बेस ट्रीटमेंटद्वारे मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू!

By राजेश भोस्तेकर | Updated: August 5, 2023 09:11 IST

गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण होणारच, रवींद्र चव्हाण यांना विश्वास

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: मुंबईगोवा महामार्गावर अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने रस्ता बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचता सिमेंट बेस ट्रीटमेंट माध्यमातून दिवसाला पाचशे मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर १२ तासाने वाहतूक सुरू केली जात आहे. अत्याधुनिक पद्धतीने बनविणारा हा रस्ता वीस वर्ष पर्यंत टिकणार आहे. गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण होणार असून डिसेंबर पर्यंत दुसरी लेन पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबईगोवा महामार्गावर नागोठणे ते पनवेल या दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा तिसरा पाहणी दौरा शनिवार पार पडला. नागोठणे चिकणी येथे नव्या अत्याधुनिक पद्धतीने काँक्रिट करणाचे काम कल्याण टोल इन्फ्रास्त्रकचार लिमिटेड या ठेकेदार कंपनी तर्फे सुरू आहे. या कामासाठी इंदोर येथून सिमेंट बेस ट्रीटमेंट अत्याधुनिक मशीनी आणल्या आहेत. यामध्ये ४० टन व्हायब्रेट रोलर, सिमेंट, केमिकल मिक्सर मशीन द्वारे रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचा बेस हा उत्तम असला तर रस्ता अधिक काळ टिकतो. यासाठी बेस टिकाऊ करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात आहे.

पर्यावरणाला हानी न पोहचता रस्त्याच्या काँक्रिटकरण काम केले जात आहे. दिवसाला पाचशे मीटर रस्त्याचे काम यंत्रणेमार्फत केले जात आहे. सिमेंट बेस ट्रीटमेंट द्वारे केलेले काम हे बारा तासाचे पक्के होऊन त्यावरून वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. बेस हा पक्का झाल्याने त्यावर काँक्रिट केले जाणार आहे. त्यामुळे पुढील वीस वर्ष हा रस्ता सुस्थितीत राहणार आहे. यंत्रणेतर्फे दिवस रात्र काम सुरू आहे. त्यामुळे गणपती पूर्वी एक लेन पूर्ण होणार असून चाकरमानी यांचा खड्याचा त्रास वाचणार आहे. 

या पद्धतीने केले जात आहे काम!

दिवसाला पाचशे मीटर काम पूर्ण होत आहे. विर्टगेन या अत्याधुनिक मशीनद्वारे आधी ३०० एम एम रस्ता कट केला जातो. यामध्ये आलेले दगडही क्रश केले जातात. त्यानंतर केमिकल, सिमेंट मिश्रित साहित्य रस्त्यावर पसरले जाते. त्यानंतर रस्त्यावर टाकलेल्या साहित्यावर ४० टन वजनाचा ग्रेडर रोलिंग द्वारे व्हायब्रेट केले जाते. त्यानंतर त्यावर सिमेंटची एक लेअर टाकून बेस पक्का केला जात आहे. पावसाळ्यातही हे काम जोराने सुरू आहे. मात्र मुसळधार पाऊस असल्यास काम थांबवावे लागत आहे. सध्या दोन मशीन द्वारे काम सुरू असून अजून चार मशीन येणार आहेत. त्यामुळे गणपती पूर्वी एक लेन पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. 

रवींद्र चव्हाण यांचे जातीने लक्ष

मुंबई गोवा महामार्ग हा बारा वर्ष रखडला आहे. नव्याने पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी घेतलेले ना. रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. रायगड सह झाराप पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा चव्हाण यांनी कार्यान्वित केली आहे. गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा ना रवींद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा करून जातीने कामाकडे लक्ष देत आहेत.

टॅग्स :alibaugअलिबागMumbaiमुंबईgoaगोवा