शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’ छत्रपती संभाजीराजेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 8:39 AM

Sambhaji Raje : निर्णय लवकरच घेतला नाही तर पुणे ते मुंबई  लाँगमार्च होणार हे नक्की, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. किरवली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. 

कर्जत : ‘मराठा समाजाकडे सत्ता आहे. त्यांच्याकडे बंगले आहेत, किमती गाड्या आहेत. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागले. पण आमच्यामध्ये सत्तर टक्के गरीब मराठा आहेत त्यांचे काय? राज्य सरकार व केंद्र सरकार आरक्षणाचा मुद्दा एकमेकांवर ढकलतात. जनजागृतीसाठी व मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी  ही जनसंवाद यात्रा आहे. निर्णय लवकरच घेतला नाही तर पुणे ते मुंबई  लाँगमार्च होणार हे नक्की, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. किरवली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. 

छत्रपती शाहू महाराजांनी सर्वजण एका छताखाली यावेत, यासाठी आरक्षणे दिली होती. मराठा समाजाला आरक्षणातून का बाहेर जावे लागले? याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने मराठा समाज सामाजिक मागास आहे, हे सिद्ध करावे तर केंद्र सरकारने आरक्षणातील ‘दूरवर व दुर्गम’ ही व्याख्या काढून टाकावी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याची अडचण दूर होईल. आरक्षणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही मराठ्यांकडे सत्ता आहे. त्यांच्याकडे सर्व काही आहे. असे सांगून विरोधकांनी चित्रपटातला निळू फुले न्यायालयात रंगवला. त्यामुळे आरक्षणाला अडचण निर्माण झाली. मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडवले. संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. त्यासाठी सकल मराठा समाजाने एकत्र या, असे ॲड. राजेंद्र कोंढले यांनी केले. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण