शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी व्हावीः राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 4:19 PM

शिवरायांची जयंती, राज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोन वेळा साजरा होतो. काही जण तो तिथीनुसार करतात, तर काही जण तारखेनुसार.

महाडः दिवाळी, गणपती किंवा सगळेच प्रमुख सण आपण तिथीनुसार साजरे करतो. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही तारखेनुसार नव्हे; तर तिथीनुसार साजरी व्हायला हवी, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली अस्मिता आहे, आपली ओळख आहे. ते महाराष्ट्राचे आराध्य दैवतच आहेत. खरं तर, त्याची जयंती ३६५ दिवस साजरी करायला हवी, त्यांचं स्मरण रोजच करायला हवं, असंही त्यांनी नमूद केलं. 

शिवरायांची जयंती, राज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोन वेळा साजरा होतो. काही जण तो तिथीनुसार करतात, तर काही जण तारखेनुसार. त्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपूर्वी मी जयंत साळगावकरांना भेटलो होतो. शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नाही, तर तो आपला सण आहे. त्यामुळे तो तिथीनुसार साजरा व्हायला हवा, असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा, असं राज म्हणाले. 

मनसेच्या नवनिर्माणाचं ध्येय समोर ठेवून राज ठाकरे राज्याचा दौरा करताहेत. त्या दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवप्रेमींनी त्यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आमंत्रण दिलं. त्यावेळी, महाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या गड-किल्ल्यांचं जतन-संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८