शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

महाड तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट; ३० गावे, १३३ वाड्यांना बसणार झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:17 IST

महिलांची पाण्यासाठी वणवण; योजना फेल 

सिकंदर अनवारे

दासगाव :  उन्हाळा आल्याने महाड तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. आजही तालुक्यात अनेक गावे अशी आहेत की गेली अनेक वर्षांपासून यांची पाणीटंचाई समस्या दूर झालेली नाही. पाणी मनुष्याच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा घटक असल्याने ग्रामीण भागातील महिलांना आपले कामधंदे टाकून पाण्यासाठी आजही वणवण फिरावे लागत आहे.

शासनाकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना राबविल्या असल्या तरी त्या आज काही निकामी ठरल्याच्या दिसून येत आहेत.यंदाच्या महाड पंचायत समितीच्या सर्व्हेनुसार जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३० गावे आणि १३३ वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे.

राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून तालुक्यांमध्ये विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्या, तरीही अनेक गावे आणि वाड्यांतून पाणी टचांई कमी झालेली नाही. महाड पंचायत समितीने स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरून तालुक्यांतील ३० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत, त्यामुळे पुढील महिन्यापासून या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील १३३ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. २०१९-२० च्या पाणी टंचाई निवारण आराखड्यांमध्ये १२ गावे, ८२ वाड्यांतून पाणीटंचाई निर्माण झाली होती, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ९ टँकरची सोय करण्यात आली होती; परंतु यावर्षी पाणी टंचाईची भीषणता वाढली आहे.

तालुक्यातील सापेतर्फे गोवेले, पिंपळकोंड, फाळकेवाडी, ताम्हाणे, आढी गाव, घुरुपकोंड, शेवते, वाकी गावठाण, मूळगाव गवळवाडी, साकडी, पाचाड गाव या ठिकाणी दरवर्षी पुरेसा पाऊस पडूनही पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे आढळून येते. तालुक्यांमध्ये अनेक गावांतून बंधारे बांधण्यात आले आहेत. नदी-नाल्यांतून पाणी साठविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून योजना राबविण्यात आल्या; परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे पाचाडचे माजी सरपंच रघुवीर देशमुख यांनी सांगितले.

नियमित पाणीपुरवठा नाहीकिल्ले रायगडच्या परिसरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ पाण्याच्या टंचाईला सामोरे जात आहेत; परंतु अद्याप अनेक गावे तहानलेली असल्याचे दिसून येते. ज्या वाड्या डोंगर कपारीमध्ये आहेत, त्याचबरोबर दुर्गम भागांमध्ये आहेत त्या वाड्यांतून पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी असताना लोकप्रतिनिधी आणि प्रसासनाकडून कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून टंचाईग्रस्त वाड्यांतील महिला डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहून नेत असताना प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या काळामध्ये टँकरने जरी पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी नियमित पाणी पुरविण्यात येत नसल्याची तक्रार सांदोशी परिसरांतील महिला करत आहेत. तालुक्यांतील टंचाईग्रस्त ग्रामपंचायतीने आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांनी केले आहे.

पाण्याच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्चशासनाकडून पाण्याच्या योजनांवर कोट्यवधी रुपये तालुक्यात खर्च केले जात असले तरी पाण्याची समस्या योग्य नियोजनाअभावी दिवसेंदिवस गंभीरच होत आहे. शासनदेखील त्याच योजनांची केवळ नावे बदलून नव्या योजनांवर करोडो रुपये पाण्यात घालवत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा आजही ग्रामीण भागात दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणी