शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

महाड तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट; ३० गावे, १३३ वाड्यांना बसणार झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:17 IST

महिलांची पाण्यासाठी वणवण; योजना फेल 

सिकंदर अनवारे

दासगाव :  उन्हाळा आल्याने महाड तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. आजही तालुक्यात अनेक गावे अशी आहेत की गेली अनेक वर्षांपासून यांची पाणीटंचाई समस्या दूर झालेली नाही. पाणी मनुष्याच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा घटक असल्याने ग्रामीण भागातील महिलांना आपले कामधंदे टाकून पाण्यासाठी आजही वणवण फिरावे लागत आहे.

शासनाकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना राबविल्या असल्या तरी त्या आज काही निकामी ठरल्याच्या दिसून येत आहेत.यंदाच्या महाड पंचायत समितीच्या सर्व्हेनुसार जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३० गावे आणि १३३ वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे.

राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून तालुक्यांमध्ये विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्या, तरीही अनेक गावे आणि वाड्यांतून पाणी टचांई कमी झालेली नाही. महाड पंचायत समितीने स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरून तालुक्यांतील ३० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत, त्यामुळे पुढील महिन्यापासून या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील १३३ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. २०१९-२० च्या पाणी टंचाई निवारण आराखड्यांमध्ये १२ गावे, ८२ वाड्यांतून पाणीटंचाई निर्माण झाली होती, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ९ टँकरची सोय करण्यात आली होती; परंतु यावर्षी पाणी टंचाईची भीषणता वाढली आहे.

तालुक्यातील सापेतर्फे गोवेले, पिंपळकोंड, फाळकेवाडी, ताम्हाणे, आढी गाव, घुरुपकोंड, शेवते, वाकी गावठाण, मूळगाव गवळवाडी, साकडी, पाचाड गाव या ठिकाणी दरवर्षी पुरेसा पाऊस पडूनही पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे आढळून येते. तालुक्यांमध्ये अनेक गावांतून बंधारे बांधण्यात आले आहेत. नदी-नाल्यांतून पाणी साठविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून योजना राबविण्यात आल्या; परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे पाचाडचे माजी सरपंच रघुवीर देशमुख यांनी सांगितले.

नियमित पाणीपुरवठा नाहीकिल्ले रायगडच्या परिसरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ पाण्याच्या टंचाईला सामोरे जात आहेत; परंतु अद्याप अनेक गावे तहानलेली असल्याचे दिसून येते. ज्या वाड्या डोंगर कपारीमध्ये आहेत, त्याचबरोबर दुर्गम भागांमध्ये आहेत त्या वाड्यांतून पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी असताना लोकप्रतिनिधी आणि प्रसासनाकडून कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून टंचाईग्रस्त वाड्यांतील महिला डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहून नेत असताना प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या काळामध्ये टँकरने जरी पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी नियमित पाणी पुरविण्यात येत नसल्याची तक्रार सांदोशी परिसरांतील महिला करत आहेत. तालुक्यांतील टंचाईग्रस्त ग्रामपंचायतीने आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांनी केले आहे.

पाण्याच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्चशासनाकडून पाण्याच्या योजनांवर कोट्यवधी रुपये तालुक्यात खर्च केले जात असले तरी पाण्याची समस्या योग्य नियोजनाअभावी दिवसेंदिवस गंभीरच होत आहे. शासनदेखील त्याच योजनांची केवळ नावे बदलून नव्या योजनांवर करोडो रुपये पाण्यात घालवत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा आजही ग्रामीण भागात दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणी