शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

राजनाला कालव्याला सोडले पाणी; शेतीच्या कामांना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:13 IST

२२०० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

कर्जत : तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्याचे पाणी दुबार शेतीसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालवा, उजवा कालवा आणि पाली पोटल कालव्यामध्ये पाणी सोडले असून, किमान २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. राजनाला कालव्याच्या पोटकालव्यात पाणी खळाळू लागल्याने बळीराजा आनंदी दिसत असून, शिवार पुन्हा एकदा हिरवेगार होऊ लागले आहे.हुमगाव ते दहिवली या कालव्याच्या तांबस येथील भागात कालव्याचा तब्बल ४० मीटरचा भाग वाहून गेला होता. त्या कामाची पुन्हा बांधणी करण्यासाठी काढलेल्या निविदांना उशीर झाल्याने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने तांबस येथे तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम पूर्ण केले. हुमगाव येथून मुख्य कालव्यातून आलेले पाणी दहिवलीपर्यंत पोहोचावे आणि शेतकºयांना दुबार भाताचे पीक घेता यावे, यासाठी पाटबंधारे विभागाने सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर पाणी सोडण्यात आले. या उजव्या कालव्यातून तब्बल ३४ गावांतील शेती ओलिताखाली येणार असून, १८०० हेक्टर क्षेत्र त्या भागात आहे. भाताचे पीक मोठ्या प्रमाणात राजनाला कालव्याच्या पाण्यावर घेतले जाते. ही बाब लक्षात घेऊन शेतीला पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण केले.टाटाच्या आंध्र धरणातून वीज निर्माण केल्यानंतर खाली सोडले जाणारे पाणी हे पेज नदीमधून वाहत जाते. तेच पाणी पुढे उल्हासनदीद्वारे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते. वीजनिर्मिती झाल्यानंतरचे पाणी नदीमध्ये जात असताना त्या ठिकाणी राजनाला कालवा बांधून शेतीसाठी वळविले गेले आहे. ते पाणी ज्या ठिकाणी मुख्य कालव्यातून उजवा, डावा आणि पोटल कालव्यात सोडले जाते. तेथे कालव्यात घातलेला बांध जेसीबीच्या साहाय्याने खोदून पाणी राजनाला कालव्यात सोडण्यात आले. या कालव्यातून पाणी आता शेवटच्या टोकावर असलेल्या कुशिवली, दहिवली भागातील शेतकरी यांच्या शेतात पोहोचले आहे. त्याच वेळी कडावच्या परिसरात तर मोठ्या प्रमाणात पाणी शेतकºयांनी कालव्यातून शेतात घेतले आहे. कालव्यांत सर्वत्र पाणी दिसत असून, शेतदेखील ओली झाली आहेत आणि पुन्हा एकदा हिरवळ उगविण्यास सुरुवात झाली आहे. तर शेतकºयांनी आता भाताची रोपे बनविण्यास सुरुवात केली आहे. भाताची रोपे ही जमिनीवर दिसू लागल्याने शेतात मध्येच हिरवेगार कोंब फुललेले दिसत आहेत.तांबस येथे वाहून गेलेल्या कालव्याच्या भागामुळे काही दिवस उशिरा पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्यानंतर आम्ही सर्व कालवे, पोटकालवे, गेट यांची पाहणी केली असून, कुठेही काही अडचण राहिली नाही. पाणी जरी उशिरा सोडले असले तरी नंतर ते उशिरा बंद केले जाईल.- अजय कदम, उपअभियंता, पाटबंधारेआमच्या भागात पाणी पोहोचले असून, आम्ही भातशेतीबरोबर भाजीपाला तसेच कडधान्य शेती करीत असून, कालव्याला पाणी आल्याने या वर्षी भाताचे पीक घेण्यावर सर्वांनी जास्त लक्ष केंद्रित केले आहे. कारण पावसाळ्यात या वर्षी भाताच्या पिकाचे नुकसान झाले होते.- प्रकाश मसणे, शेतकरी, पाली