शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विक्रमी भातासाठी ‘एसआरटी’चा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:39 IST

कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात.

- जयंत धुळप अलिबाग : कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात. सध्या भातपेरणीचा मोसम सुरू आहे. त्यामुळे बळीराजाची लगबग सुरू आहे. पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा निर्णय रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी यंदा घेतला आहे. त्यामुळे पारंपरिक भातशेतीच्या उत्पादन खर्चात तब्बल ६० टक्के बचत होणार आहे. सरासरी ७ ते १० क्विंटल प्रति एकरी असणारी पारंपरिक तांदूळ (भात) उत्पादकता तब्बल १८ ते २२ क्विंटल प्रति एकरी साध्य करण्याचा यशस्वी प्रयोग कर्जत तालुक्यातील करण्यात आला आहे. जवळपास १३ वर्षे संशोधन करून तयार केलेल्या ‘एसआरटी’चा (सगुणा राईस तंत्र) स्वीकार आतापर्यंत राज्यातील ३ हजार शेतकºयांनी केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्यात आणखी १५०० शेतकºयांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही संख्या जवळपास साडेचार हजारांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती ‘एसआरटी’ भातशेती तंत्राचे संशोधक शेखर भडसावळे यांनी दिली.१९९८ मध्ये एसआरटी संशोधनाला सुरुवात करण्यात आली. त्याचा पहिला यशस्वी प्रयोग आॅक्टोबर २०११ मध्ये झाला. तांदळाची पारंपरिक एकरी सरासरी उत्पादकता ७ ते १० क्विंटल होती ती एसआरटीच्या प्रयोगाने १८ ते २२ क्विंटलपर्यंत पोहोचेली. त्यानंतर २०१३ मध्ये ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ३० शेतकºयांना प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्र शेतीसाठी देण्यात आले. त्यांनाही सकारात्मक परिणाम जाणवला. २०१४ मध्ये दापोलीच्या कोकण विद्यापीठाने एसआरटी तंत्राचा प्रयोग स्वीकारून भात लागवड केली, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या तंत्राचा झपाट्याने प्रसार झाला. सद्यस्थितीत सगुणाबागेत सामाजिक उपक्रमांतर्गत १५ कृषी पदवीधर शेतकºयांना या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कृषी तज्ज्ञ विविध जिल्ह्यांत जाऊन आधुनिक तंत्रज्ञानातून शेती करण्याबाबत प्रसार करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील शेतकºयांना भाताची उत्पादकता गतवर्षी ४० ते ५० क्विंटल प्रति एकरी मिळाली आहे.एस.आर.टी. मध्ये शेतीत नांगरट केली नाही तरीही जमीन भुसभुशीत रहाते. एकदा नांगरणी केल्यानंतर साडेचार फुटावर वाफे पाडून, त्यात खरिपात पहिले पीक घेतले जाते. त्यानंतर रब्बीत वाल आणि उन्हाळ्यात मुगाचे नियोजन असते.उन्हाळ्यातील मुगाच्या काढणीनंतर १८ जूनला भातलागवडीच्या कामाला प्रारंभ होतो. जास्त फुटवा येणाºया भातरोपांचे २५ बाय २५ सेंटिमीटरवर टोकण केले जाते, तर बासमतीसारख्या कमी फुटव्याच्या जातींची २० बाय २४ सेंटिमीटरवर लागवड केली जाते.>पिकांची फेरपालटअधिक उत्पादन देणारीभातशेतीत चिखलणी, कोळपणीची किचकट आणि कष्टाची कामे कमी करण्यासाठी २० वर्षांपूर्वी प्रयत्न सुरु केले. याच काळात त्यांनी गादीवाफ्यावर भुईमूग लावला, उरलेल्या काही गादीवाफ्यांवर त्यांनी भाताची लागवड केली. पारंपरिक भातापेक्षा गादीवाफ्यावर भात उत्पादन चांगले आले.या प्रयोगातूनच एस.आर.टी.चा जन्म झाला. एस.आर.टी. म्हणजे भात शेतीसाठी शून्य मशागत तंत्र. यात भात शेतीला मध्यवर्ती धरून त्या भोवतालच्या पिकांची फेरपालट केली जाते. एस.आर.टी.मध्ये भातशेतीत चिखलणी आणि कोळपणी या कष्टाच्या समजल्या जाणाºया कामांना फाटा देण्यात आला आहे. शिवाय भाताचे उत्पन्नही वाढणार आहे.>एस.आर.टी. नेमके काय?भात हे भारतीयांचे प्रमुख अन्न आहे. त्यामुळे तांदळाचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे, त्यासाठी सगुणा बागेत एनजीओच्या माध्यमातून १५ कृषी तज्ज्ञांनी टीम विविध उपक्रम राबवित आहे.सात ते आठ वर्षे नांगरणीची गरज नाही.गादीवाफ्यावर भाताची लागवड.चिखलणी आणि कोळपणीची गरज नाही.भाताची मुळे जमिनीतच कुजण्याची प्रक्रि या.खरिपात धान, रब्बीत वाल आणि मुगाची फेरपालट असे एसआरटी भातशेती तंत्राचे पाच महत्त्वाचे टप्पे आहेत.एसआरटीमध्ये खताची मात्राही कमीसध्या शेतीसाठी मजूर मिळणेही अवघड झाले आहे. मजुरांअभावी काही ठिकाणी भात लागवड होत नाही. अशा परिस्थितीत एस.आर.टी. तंत्र प्रभावी ठरत आहे. भातशेतीत कष्ट कमी करणे, जमिनीचे आरोग्य जपणे, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे आणि भाताची उत्पादकता वाढवणे ही एस.आर.टी. तंत्राची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एस.आर.टी. मध्ये खत देखील कमी लागते. कर्जत तालुक्यातील १०० भात उत्पादक एसआरटीमुळे ५० हजार लिटर डिझेलची बचत करु शकत आहेत.शेतकºयांना मोफत एसआरटी प्रशिक्षणकर्जत येथे सगुणाबागेत एसआरटी तंत्र शिकण्याकरिता येणाºया शेतकºयांना मोफत मार्गदर्शन करण्यात येते. त्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था देखील मोफत केली जाते. त्यानंतर शेतकºयांच्या गावांत प्रशिक्षण अपेक्षित असल्यास तेथे एसआरटी प्रशिक्षक जावून मोफत प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षण संधीचा भात उत्पादक शेतकºयांनी लाभ घेवून शेतीतील खर्च कमी करुन उत्पादकता वृद्धिंगत करावी अशी अपेक्षा आहे.- शेखर भडसावळे,एसआरटी संशोधक शेतकरी