शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 1:11 AM

Raigad : होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.

मुरुड : गुरुवारी रात्री १०. ३० नंतर मुरुड तालुक्यात जोरदार वारे सुटल्यामुळे येथील नागरिक भयग्रस्त झाले होते. तर शुक्रवारी सकाळी सूर्यदर्शन झालेच नाही. ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या होड्यांनी पुन्हा किनारा गाठला आहे. ढगाळ वातावरणाचा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे.होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.मुरुड तालुक्यासह रोहा, बारशीव व अन्य ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीने पाऊस पडला आहे. बहुतांशी भागातील होड्या किनाऱ्याला लागलेल्या आढळून आल्या आहेत. तर काही बोटींनी मुंबई येथे आसरा घेतला आहे. हवामान खात्याने पहिलेच अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणे अवकाळी पाऊस काही भागात पडला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हेच वातावरण पुढे आठ ते दहा दिवस राहिल्यास मच्छीमारांचे मोठे हाल होणार आहेत. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी तुटपुंजी सापडत असल्याने बोटीवर होणार खर्चसुद्धा निघत नाही. त्यातच डिझेलचे वाढते भाव व रेशनिंगचे वाढलेले भाव यामुळे मच्छीमारांची स्थिती चिंताजनक झाली आहे. मच्छीमार मासळी पकडण्या व्यतिरिक्त इतर कोणतेही काम करीत नाहीत. केवळ मासळी पकडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. अन्य मार्गाने कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने केवळ मासळीवरच त्यांचे जीवन अवलंबून आहे.शासनाकडून अद्यापर्यंत डिझेल परतावा रक्कमसुद्धा अदा करण्यात आलेली नाही. क्यार व चक्री वादळाची मदतसुद्धा काही मच्छीमार सोसयट्यांना मिळालेली नाही. त्यामुळे सध्या मच्छीमार अनेक संकटावर मात करून जीवन कसेबसे जगत आहेत.

सनाकडून मिळणारी मदत तुटपुंजीरायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांच्याशी संपर्क साधला असता हवामान खात्याने अगोदरच सूचना केली होती. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस व ढगाळ वातावरण राहिले आहे. काही भागात जोरदार वारेसुद्धा वाहिले आहेत. त्यामुळे मच्छीमार बोटींनी जिथे मिळेल तिथे आसरा घेतला आहे. मासेमारीची आता फक्त तीन महिने बाकी राहिले आहेत. येणाऱ्या तीन महिन्यात मासळी मुबलक प्रमाणात मिळणे खूप गरजेचे आहे. जून महिन्यापासून मासेमारी बंद असते. अशावेळी आगामी तीन महिन्यावर मच्छीमारांचे जीवन निर्भर असणार आहे. शासनाकडून मिळणारी मदत ही फारच तुटपुंजी व वेळखाऊ असणारी असते. आता तरी शासनाने मच्छीमारांना विशेष पॅकेज जाहीर करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड