शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

वारे गावात पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 1:11 AM

मार्च महिन्यातच कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाडे-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. वारे ग्रामपंचायतीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे.

- कांता हाबळेनेरळ : मार्च महिन्यातच कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाडे-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. वारे ग्रामपंचायतीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे.कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम डोंगराळ भागात नवसुचीवाडी, हऱ्याचीवाडी, जांभूळवाडी या आदिवासी वाड्या आहेत. या वस्त्यांवर सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, महिलांना डोंगराळ रस्ता पार करून पाणी आणावे लागत आहे. या वाड्या-वस्त्यांवर मागील काही वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्चून पाणी योजना राबविल्याही आहेत; परंतु नियोजनांचा अभाव व ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामांमुळे त्या योजना नादुरु स्त झाल्या आहेत. परिणामी, या भागातील लोकांना नळपाणी योजनांचा लाभ आजतागायत घेता आला नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.ग्रामस्थांना डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या विहिरी, नाल्यातून पाणी आणावे लागते. काही ठिकाणी नदीपात्रात खड्डे खोदून गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यासाठी रोजच दोन-तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. या भागातील आदिवासी बांधव मोलमजुरी, भाजीपाला लागवड व अन्य कष्टाची कामे करून उपजीविका करतात. महिलांचा बहुतांश वेळ पाणी भरण्यात जात असल्याने रोजगारावरही परिणाम होत आहे, त्यामुळे टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.पाणीटंचाईमुळे पहाटे उठून पाणी भरावे लागत आहे. त्यासाठी वाडीपासून दूर पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी भरावे लागत आहे. त्यात रस्ता खराब व चढाचा असल्याने दमछाक होत आहे. मोलमजुरीही करता येत नाही.- भागीबाई पारधी,ग्रामस्थ, जांभूळवाडीआमच्या वाडीतील पाणी योजना बंद आहे. फक्त शोसाठी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत; परंतु आजपर्यंत नळांना पाणी काही आले नाही. यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- नरेंद्र दुदा,ग्रामस्थ, जांभूळवाडीवारे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाड्या-वस्तीवरील पाणीटंचाईचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही ग्रामपंचायतीकडून केली जाईल.- योगेश राणे, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत वारे

टॅग्स :Waterपाणी