शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 05:55 IST

Raigad News: मृतांमध्ये म्हसळा तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुले आणि ऐरोली येथील मित्राचा समावेश आहे.

दिघी :  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी शनिवारी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील तीन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये म्हसळा तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुले आणि ऐरोली येथील मित्राचा समावेश आहे. अवधूत संतोष पाटील (वय २६), मयुरेश संतोष पाटील (२३) आणि ऐरोली येथील मित्र हिमांशू पाटील (२१) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गोंडघर येथील अवधूत व मयुरेश चार मित्रांसह वेळास समुद्रकिनारी फिरायला गेले होते. समुद्रकिनारी क्रिकेट खेळताना बॉल समुद्रात गेल्याने ऐरोली येथील हिमांशू पाटील तो आणायला गेला.

मात्र तो बुडत असल्याचे दिसताना दोघे भाऊ त्याला वाचवायला गेले, पण ओहोटीची वेळ असल्याने तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन ते खोल पाण्यात ओढले गेले. या घटनेमुळे गोंडघर परिसरात खळबळ उडाली होती.     

सहा महिन्यांपूर्वीच अवधूतचे झाले होते लग्न 

अवधूत याने दोन दिवसांपूर्वीच नवीन कार घेतली होती. विशेष म्हणजे त्याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. 

समुद्रावर फिरायला न जाता घरी कारची पूजा करण्याचा आग्रह  कुटुंबियांनी केला होता, मात्र तो मित्रांसह फिरायला गेला. 

रुग्णालयात नातेवाइकांची, नागरिकांची गर्दी 

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ धवल तवसाळकर, निलेश कदम, समुद्रकिनारी पोहचले. यांनी दिघी सागरी पोलिसांना घटनेबद्दल कळविले.

दिवेआगर येथील वॉटर स्पोर्ट बोटी व आदगाव येथील कोळी बांधवांनी बोटी घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. या ‌वे‌ळी रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. 

टॅग्स :dighiदिघीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPoliceपोलिस