शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

आदिवासींचा प्रवास खडतर; वंजारपाडा, देवपाडा रस्ता बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:56 PM

लोकप्रतिनिधींंसह, अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष

- कांता हाबळे नेरळ : वंजारपाडा-देवपाडा तसेच पुढे अनेक आदिवासीवाड्यांना जोडणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने वाहन चालवणे धोकादायक बनले असून अनेक अपघात या रस्त्यावर घडत आहेत. तसेच या रस्त्यावरील वंजारपाडा येथील घाटरस्त्यावर संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होतआहे.

नेरळ-देवपाडा हा सुमारे दहा कि.मी.चा रस्ता असून, या रस्त्यावरील वंजारपाडा ते देवपाडा भागात तसेच पुढील आदिवासीवाड्यांना जोडणाºया रस्त्यावरील डांबराचा थर निघून गेल्याने या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही, तसेच रस्त्यावरील खड्डेदेखील भरले नाहीत. त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

याच रस्त्यावर वंजारपाडा गावालगत असणाºया घाटरस्त्यावर भारत एज्युकेशन सोसायटीचे माथेरान हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आहे. यांची स्कूलबसही याच घाटरस्त्यातून ये-जा करत असते. येथे धोकादायक वळण असून रस्त्यावर खोल दरी असल्याने येथे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याला संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु याची दखल अद्याप ना लोकप्रतिनिधींनी घेतली ना अधिकाऱ्यांनी. निवडणुकीत आश्वासन देणारे मात्र आता गायब झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावर डांबरीकरण करावे आणि नागरिकांना, प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.

नादुरुस्त रस्त्यामुळे एसटी सेवा बंद

देवपाडा, तसेच पुढील अनेक आदिवासी भागातील नागरिक नेरळ येथे येत असतात; परंतु या रस्त्यावर प्रवास करताना वाहनचालक, प्रवासी, रुग्ण, गरोदर महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे नेरळ-देवपाडा एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. या रस्त्यावरून स्कूलबस, अनेक मोठमोठी खासगी वाहने, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच वारे भागातून प्रवासी या मार्गाने येत असतात.

गेल्या अनेक वर्षांपासून वंजारपाडा ते देवपाडा रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही, त्यामुळे रस्त्यावरील खडी वर अली आहे.हा रस्ता धोकादायक बनला असून, छोटे-मोठे अपघात घडत आहेत. येथून प्रवास करताना प्रवासी, वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्यावर लवकर डांबरीकरण करावे.- निवृत्ती झोमटे, ग्रामस्थ, देवपाडा

मागील वर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडे रस्त्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता; परंतु दहिवली ते वंजारपाडापर्यंतच रस्ता मंजूर झाला. या रस्त्याची पाहणी करण्यात आली असून, या वर्षी पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.- पी. एस. गोपणे,शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार