शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

आदिवासी आर्थिक संकटात; उत्पन्न असतानाही आंबा, काजू पिकाला मिळाला नाही दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:45 IST

- अरुण जंगम म्हसळा : तालुक्यातील आदिवासी समाजाला लॉकडाऊनचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. ऐन हंगामामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ...

- अरुण जंगमम्हसळा : तालुक्यातील आदिवासी समाजाला लॉकडाऊनचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. ऐन हंगामामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे, हातात मुबलक प्रमाणात आंबा व काजूची पिके असूनही योग्य दर मिळाला नाही. परिणामी, या आदिवासींना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या उन्हाळी हंगामामध्ये अपेक्षेप्रमाणे आंबा व काजूची पिके आली, परंतु कोरोनामुळे संचारबंदी असल्याने बाजारपेठ बंद झाली. पर्यायाने या अदिवासींना घरोघरी जाऊन विक्री करावी लागली. आदिवासी समाजास बारमाही उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही, उन्हाळी हंगामामध्ये येणाऱ्या आंबा व काजू, करवंद, तर पावसाळी हंगामामध्ये रानभाज्या विकू न आपला उदरनिर्वाह चालवितात.

पावसाळ्यात डोंगराळ भागात उगवणाºया रानभाज्या या आदिवासी समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनल्या आहेत. पावसाच्या दिवसांत रानभाज्यांच्या विक्रीतून मिळणाºया पैशांतून त्यांची रोजीरोटी चालते. मात्र, जिल्हा लॉकडाऊनमुळे हे उत्पन्नाचे साधनच हरवल्याने, आदिवासी समाजाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून, उपासमारीची वेळ आली. पावसाळ्यात आदिवासी समाजाला मोलमजुरीसाठी कामे फार कमी प्रमाणात असतात. त्यामुळे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आदिवासी समाज या हंगामात डोंगराळ भागात उगवणाºया टाकळा, टेरी, कुडा, अळू, अळंबी, कुलू, कंटोळी, कुरडू, भारंग, दिंडा अशा कितीतरी प्रकारच्या रानभाज्या घेऊन बाजारात विक्रीसाठी आणतात. खवय्यांनाही या रानभाज्यांची मेजवानी मिळते.

रुचकर, औषधी गुणांमुळे नागरिकांमधून या रानभाज्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांच्या विक्रीतून आदिवासी महिलांना दोन पैसे मिळतात. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालतो, परंतु कोरोनामुळे आधी कें द्र, राज्य सरकारने आणि आता रायगडमध्ये पालकमंत्र्यांनी१५ जुलै ते २६ जुलैपर्यंत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हे उदरनिर्वाहाचे साधनही हिरावले गेले आहे.बाजारपेठ बंद असल्याने या गोरगरीब आदिवासी समाजासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रानभाज्या आणून बाजारात विकून उदरनिर्वाह करणाºया आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

ते तीन वर्षे आर्थिक संकट

निसर्ग चक्रीवादळाने उत्पन्न देणारी आंब्याची, तसेच काजूची झाडे उन्मळून पडली असून, पुढील दोन ते तीन वर्षे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात जाणार आहेत. पुन्हा नव्याने लागवड केल्यास साधारणत: कलम उत्पादन क्षमतेचे होण्यास दोन ते तीन वर्षे लागतात.त्यामुळे पुढील काही वर्षे उत्पादन न मिळाल्यास या समाजावर मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंबा व काजूचे उत्पादन न मिळाल्यास पर्यायाने मोळी (सरपणाची सुकी लाकडे) विकून आपला उदरनिर्वाह चालवावा लागेल, यात तीळमात्र काही शंका येत नाही.

या हंगामामध्ये मुबलक प्रमाणात आंबा व काजूची पिके आली, परंतु संचारबंदी असल्याने २०० रुपये शेकड्याने विक्री होणारे ओले काजूचे गर ६० ते ७० रुपये शेकडा दराने विकावे लागले. पर्यायाने पावसाळ्यामध्ये लागणारे सामान जसे मसाले, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तू घेता आल्या नाहीत.- प्रकाश पवार, म्हसळा अदिवासीवाडी अध्यक्ष

बागांची निगा राखून त्यामधून मिळणाºया उत्पन्नावर आमचे घर चालते. मात्र, संचारबंदीमुळे अपेक्षित दर आंबा व काजूला मिळाला नाही. पर्यायाने आमच्या समाजातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.- यशवंत पवार, सरपंच, म्हसळा अदिवासीवाडी

लॉकडाऊनमध्ये सरकारकडून आम्हाला मोफत तांदूळ व गहू मिळतात. मात्र, त्यासोबत इतरही जीवनावश्यक वस्तू लागतात. या वस्तू महाग झाल्याने, आम्ही मुबलक प्रमाणात घेऊ शकत नाही. पावसाळ्याद रानभाज्या विकून दोन पैसे मिळण्याची आशा होती. मात्र, जिल्हा लॉकडाऊनमुळे या उत्पन्नालाही मुकावे लागते.- जानकी माडवकर, रानभाज्या विकणारी महिला

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड