शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

आदिवासी आर्थिक संकटात; उत्पन्न असतानाही आंबा, काजू पिकाला मिळाला नाही दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:45 IST

- अरुण जंगम म्हसळा : तालुक्यातील आदिवासी समाजाला लॉकडाऊनचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. ऐन हंगामामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ...

- अरुण जंगमम्हसळा : तालुक्यातील आदिवासी समाजाला लॉकडाऊनचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. ऐन हंगामामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे, हातात मुबलक प्रमाणात आंबा व काजूची पिके असूनही योग्य दर मिळाला नाही. परिणामी, या आदिवासींना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या उन्हाळी हंगामामध्ये अपेक्षेप्रमाणे आंबा व काजूची पिके आली, परंतु कोरोनामुळे संचारबंदी असल्याने बाजारपेठ बंद झाली. पर्यायाने या अदिवासींना घरोघरी जाऊन विक्री करावी लागली. आदिवासी समाजास बारमाही उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही, उन्हाळी हंगामामध्ये येणाऱ्या आंबा व काजू, करवंद, तर पावसाळी हंगामामध्ये रानभाज्या विकू न आपला उदरनिर्वाह चालवितात.

पावसाळ्यात डोंगराळ भागात उगवणाºया रानभाज्या या आदिवासी समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनल्या आहेत. पावसाच्या दिवसांत रानभाज्यांच्या विक्रीतून मिळणाºया पैशांतून त्यांची रोजीरोटी चालते. मात्र, जिल्हा लॉकडाऊनमुळे हे उत्पन्नाचे साधनच हरवल्याने, आदिवासी समाजाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून, उपासमारीची वेळ आली. पावसाळ्यात आदिवासी समाजाला मोलमजुरीसाठी कामे फार कमी प्रमाणात असतात. त्यामुळे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आदिवासी समाज या हंगामात डोंगराळ भागात उगवणाºया टाकळा, टेरी, कुडा, अळू, अळंबी, कुलू, कंटोळी, कुरडू, भारंग, दिंडा अशा कितीतरी प्रकारच्या रानभाज्या घेऊन बाजारात विक्रीसाठी आणतात. खवय्यांनाही या रानभाज्यांची मेजवानी मिळते.

रुचकर, औषधी गुणांमुळे नागरिकांमधून या रानभाज्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांच्या विक्रीतून आदिवासी महिलांना दोन पैसे मिळतात. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालतो, परंतु कोरोनामुळे आधी कें द्र, राज्य सरकारने आणि आता रायगडमध्ये पालकमंत्र्यांनी१५ जुलै ते २६ जुलैपर्यंत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हे उदरनिर्वाहाचे साधनही हिरावले गेले आहे.बाजारपेठ बंद असल्याने या गोरगरीब आदिवासी समाजासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रानभाज्या आणून बाजारात विकून उदरनिर्वाह करणाºया आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

ते तीन वर्षे आर्थिक संकट

निसर्ग चक्रीवादळाने उत्पन्न देणारी आंब्याची, तसेच काजूची झाडे उन्मळून पडली असून, पुढील दोन ते तीन वर्षे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात जाणार आहेत. पुन्हा नव्याने लागवड केल्यास साधारणत: कलम उत्पादन क्षमतेचे होण्यास दोन ते तीन वर्षे लागतात.त्यामुळे पुढील काही वर्षे उत्पादन न मिळाल्यास या समाजावर मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंबा व काजूचे उत्पादन न मिळाल्यास पर्यायाने मोळी (सरपणाची सुकी लाकडे) विकून आपला उदरनिर्वाह चालवावा लागेल, यात तीळमात्र काही शंका येत नाही.

या हंगामामध्ये मुबलक प्रमाणात आंबा व काजूची पिके आली, परंतु संचारबंदी असल्याने २०० रुपये शेकड्याने विक्री होणारे ओले काजूचे गर ६० ते ७० रुपये शेकडा दराने विकावे लागले. पर्यायाने पावसाळ्यामध्ये लागणारे सामान जसे मसाले, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तू घेता आल्या नाहीत.- प्रकाश पवार, म्हसळा अदिवासीवाडी अध्यक्ष

बागांची निगा राखून त्यामधून मिळणाºया उत्पन्नावर आमचे घर चालते. मात्र, संचारबंदीमुळे अपेक्षित दर आंबा व काजूला मिळाला नाही. पर्यायाने आमच्या समाजातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.- यशवंत पवार, सरपंच, म्हसळा अदिवासीवाडी

लॉकडाऊनमध्ये सरकारकडून आम्हाला मोफत तांदूळ व गहू मिळतात. मात्र, त्यासोबत इतरही जीवनावश्यक वस्तू लागतात. या वस्तू महाग झाल्याने, आम्ही मुबलक प्रमाणात घेऊ शकत नाही. पावसाळ्याद रानभाज्या विकून दोन पैसे मिळण्याची आशा होती. मात्र, जिल्हा लॉकडाऊनमुळे या उत्पन्नालाही मुकावे लागते.- जानकी माडवकर, रानभाज्या विकणारी महिला

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड