शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:12 AM

पर्यटकांची गर्दी : महामार्ग रुंदीकरणाचे काम संथ गतीने ; काम वेळेत न झाल्यास वाहतूक कोंडी वाढणार

पेण : सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला असून दररोज लाखो वाहने मुंबई, ठाणे, कल्याणकडून कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर ये-जा करू लागली आहेत. रायगडातील लोकसभेची निवडणूक संपली असून सध्या पर्यटकांनी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीची मजा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र पेण ते वडखळ मार्गावर बायपास पूल रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र हा रस्ता तयार न झाल्यामुळे जुन्या रस्त्यावरूनच वाहने ये -जा करीत आहेत. त्यातच रामवाडी येथील उड्डाणपुलाचे काम, उचेडे येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू असून सिंगल सर्व्हिस रोडवरून वाहनांची ये -जा सुरू असल्याने वडखळ ते पेण महामार्गावर दररोज वाहतूककोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.

नेहमीच्या वाहतूककोंडीत शनिवार, रविवारचा जर वार असेल तर अधिक भर पडत आहे. ज्यांना अधिकची सुट्टी मिळाली नाही ते वीकेण्डचा पर्याय म्हणून शनिवार, रविवार हे हक्काचे सुट्टीचे वार म्हणून अलिबाग, मुरुड-जंजिरा, किहीम बीच, नागाच बीच, काशिद बीच तसेच श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगर बीच, महाबळेश्वरकडे जाण्यासाठी एक दिवस निवासी किंवा त्याच दिवशी परत जावून येवून करण्यासाठी कुटुंबीयांसह स्वत:च्या गाडीने प्रवास करतात.

वडखळ -पेण महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने, जागोजागी पुलांची अर्धवट कामे, रस्ता रुंदीकरणाची अर्धवट कामे व रस्त्यातच खोदकामात माती दगड तसेच ठेवून ठिकठिकाणी वळणदार मार्ग तसेच ठेवल्याने सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो वाहनांना या वाहतूककोंडीत अडकून राहावे लागत आहे. 

दररोज लागतात वाहनांच्या रांगापेण ते वडखळ हे ६ किमीचे अंतर असले तरी अजूनही या प्रवासाला २० ते २५ मिनिटे वेळ जात आहे. पेण रेल्वे स्टेशनपासून रामवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वे उड्डाण ब्रीजचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पुढे उचेडे येथे पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. या दोन्ही कामामुळे एकेरी सर्व्हिस मार्ग शिल्लक ठेवला आहे. या ठिकाणी दररोज वाहनांच्या रांगा लागत आहेत. पुढील महिन्यात अधिक वाहने या मार्गावरून जाणार असून हे काम पूर्ण न झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होईल.

टॅग्स :Mumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी