शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 11:01 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. केंबुर्ली ते वहुर-दासगावदरम्यान खाडीलगत दरड कोसळल्याने संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

दोन जेसीपी व एका क्रेनच्या सहाय्याने दरडीचा ढिगारा हटवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेच प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना दिली आहे.  

काेसळलेल्या दरडीत दगडांपेक्षा लाल मातीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे, चिखलावरुन वाहने घसरण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी काेणत्याही प्रकारे घाई करु नये. वाहतूक पाेलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वराडे यांनी केले आहे. दरम्यान, मुंबईकडून गाेव्याकडे जाण्याकरता छाेट्या वाहनांसाठी 'माणगांव-निजामपुर-पाचाड-महाड' हा पर्यायी मार्गदेखील उपलब्ध आहे.

वाहतूक थांबवली

मुंबई गोवा महामार्गाच्या रूंदीकरणासाठी अनेक ठिकाणी डोंगर खोदण्यात येत आहेत. मात्र केंबुर्ली येथील डोंगर खोदण्यात आलेले काम अर्धवट सोडल्यामुळे ह्या ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत त्याठिकाणी एका बाजूला सावित्री नदीचा प्रवाह असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. बुधवारी (4 जुलै) रात्रभर आणि गुरुवारी (5 जुलै) पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे अखेर या धोकादायक ठिकाणच्या दरडी कोसळल्या. महामार्ग विभागाकडून दरडी बाजूला करण्याचे काम सुरू असून टोळ पुलाजवळ व महाड शहराजवळ वाहतूक थांबवण्यात आली आहे. महाडकडे येणारी वाहतूक टोळ म्हाप्रळ शिरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, उपनिरीक्षक पंकज गिरी यांच्यासह महामार्ग वाहतूक पोलीस, महामार्ग विभाग घटनास्थळी कार्यरत आहेत.

नडगावजवळ देखील दरडीचा धोका

महामार्गाच्या रूंदीकरणासाठी महाड पोलादपूरदरम्यान नडगाव येथील डोंगर मोठ्या प्रमाणावर खोदून हे काम अर्धवट सोडून पावसाळ्यापूर्वी थांबवण्यात आले आहे. या ठिकाणच्या दरडीदेखील मुसळधार पावसाने कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीतीने औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या ठिकाणी देखील एका बाजूला सावित्री नदीचा प्रवाह असल्याने दरडी कोसळल्यास  मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.

 

टॅग्स :landslidesभूस्खलनMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगडgoaगोवाMumbaiमुंबईhighwayमहामार्गRainपाऊसTrafficवाहतूक कोंडी