शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

...तर ढाकमधील मतदार बहिष्कार टाकतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:17 IST

कर्जत विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागात असलेले ढाक येथील मतदान केंद्र निवडणूक यंत्रणेने दुर्गम भागातून हलवून खाली पायथ्याशी आणले आहे.

कर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघात असलेले ढाक हे दुर्गम भागातील मतदान केंद्र हलविण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या गावाचे अस्तित्व हरवून जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी न ठेवल्यास ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.कर्जत विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागात असलेले ढाक येथील मतदान केंद्र निवडणूक यंत्रणेने दुर्गम भागातून हलवून खाली पायथ्याशी आणले आहे. त्यांच्या ग्रामपंचायतीमधील वदप येथील संजयनगरमध्ये असलेल्या अंगणवाडी केंद्रात नवीन १५६ क्रमांकाचे मतदान केंद्र सुरू होणार आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेच्या या नवीन बदलाबद्दल आक्षेप ढाक ग्रामस्थांनी घेतला आहे. त्याबाबत ७ आॅक्टोबर रोजी ढाक ग्रामस्थांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आपली फिर्याद मांडली. त्या वेळी ढाक ग्रामस्थ निवृत्ती ढाकवळ, मोहन ठाकरे, मनोज ढाकवळ, दामू ढाकवळ, बळीराम ठाकरे, गोविंद ढाकवळ, पप्पू ठाकरे, राजू ठाकरे आदीसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी या सर्व ग्रामस्थांनी आपल्या गावाचे अस्तित्व हरवून जाऊ शकते. आमचे गाव महसुली गाव असूनदेखील त्या ठिकाणी मतदानकेंद्र नसल्याने हा आमच्यावर अन्याय आहे, अशा तक्रारी केल्या.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दुर्गम भागातील मतदानकेंद्र आणि इमारतीत पहिल्या मजल्यावरील मतदानकेंद्रे ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने हालविण्यात येत आहेत. आपल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक होत असलेल्या ठिकाणी जी मतदानकेंद्र इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असतील तर ती तळमजल्यावर घ्यावीत आणि दुर्गम भागातील मतदानकेंद्रदेखील मतदारांना सोयीचे होईल, अशा ठिकाणी घेण्याचे आदेश होते. त्यानुसार कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघातील खोपोली शहरातील विहारी भागातील तीन आणि वरची खोपोली एक असे चार मतदानकेंद्र हे पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर आणले आहे. तर कर्जत तालुक्यात चार मतदानकेंद्र ही दुर्गम भागात असून त्यातील १५६ ढाक हे मतदानकेंद्र खाली पायथ्याशी आणण्याचा निर्णय घेतला आहे.एकू ण१८३ मतदारवदप येथील संजयनगरभागात असलेल्या अंगणवाडी केंद्रात ढाक येथील १८३ मतदार असून निवडणूक यंत्रणेचा हा निर्णय मान्य नसल्याने ग्रामस्थांनी २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :karjat-acकर्जतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019