शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

उत्तरकार्यावेळी तळीयेमध्ये फुटला नातलगांच्या अश्रूंचा बांध, जागविल्या आप्तांच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 08:47 IST

महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता.

रायगड : महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता. अशा शोकाकुल वातावरणात तळीये गावात मृतांचे उत्तरकार्य पार पडले.२२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत तळीये गावात पूर्ण डोंगर वाडीवर कोसळला आणि क्षणार्धात वाडीला गिळून टाकले होते. सरकार आणि प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले. मात्र, एकही जिवंत व्यक्ती सापडली नाही. ५४ मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले. उर्वरित ३१ नागरिकांना मृत घोषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आला आहे. काही मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तळीये दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृतांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रीतीरिवाजाप्रमाणे ८४ मृतांचे तेराव्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांना दुःख अनावर होत होते. तसबिरीचे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या दु:खात त्यांनी हंबरडा फोडला. तळीये गावावर शोककळा पसरली होती.उत्तर कार्यासाठी प्रशासनाने सहकार्य केले. ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घडलेली दुर्घटना अत्यंत वाईट असून, मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, ठाण्याचे उपमहापौर नरेश म्हस्के, अशोक पांडे, पंचायत समिती सभापती स्वप्ना मालुसरे, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड  उपस्थित होते. 

ग्रामस्थ झाले भावनावश तळीये दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृतांच्या आत्माला शांती लाभावी यासाठी रीतीरिवाजाप्रमाणे ८४ मृतांचे तेराव्याचे उत्तरकार्य गावात करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांना दुःख अनावर होत होते. तसबिरीचे दर्शन घेताना आपला माणूस गेल्याच्या दु:खात त्यांनी हंबरडा फोडला. तळीये गावावर शोककळा पसरली होती.

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलन