शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Taliye Landslide : आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 22:23 IST

Taliye Landslide : कोणाची हात मान पाय सापडत आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश वाढत होता. मृतदेहाची अवहेलना पाहवत नव्हती, त्यामुळे या पुढे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

- आविष्कार देसाई

रायगड : तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, आज दिवसभरात 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले.तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र मृतांचे नातेवाईक यांनी बचाव कार्य थांबवा, असे संमती पत्र लिहून दिल्यास बचाव कार्य थांबण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

कोणाची हात मान पाय सापडत आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश वाढत होता. मृतदेहाची अवहेलना पाहवत नव्हती, त्यामुळे या पुढे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. शनिवारी आणि रविवारी केली होती. मात्र 85 मृतदेह हाती लागत नाहीत, तोपर्यंत बचाव कार्य सुरूच राहणार, असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले होते, त्यामुळे आज दिवसभर ग्रामस्थ संभ्रमात होते. 

सायंकाळी साडेसहा वाजता चौधरी घटनास्थळी आल्या, त्यांनी बचाव कार्य सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या, त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली, आमच्या गावातील मृत्यू पावलेल्या नागरीकांची अवहेलना पाहवत नाही, ढिगाऱ्याखालून कोणाचे हात तर कोणाचे पाय भेटत आहेत, कृपया बचाव कार्य थाबवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली, सरकारी मदत अन्य लाभ मिळण्यासाठी मृत देह मिळणे आणि त्याची ओळख पटणे गरजेचे आहे, त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे. 

चमत्कार होऊन एखादा माणूस जीवंत सापडला तर, त्याचे जीव वाचू शकतात, असे चौधरी यांनी सांगितले. त्यानंतर स्थानिक आमदार भरत गोगावले तेथे आले. त्यांनी ही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाला संमती पत्र लिहून दिले तर बचावकार्य उद्यापासून थांबण्यात येईल, असे चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडfloodपूर