शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:10 IST

कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.

जयंत धुळप अलिबाग : कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. मात्र, भिवघरच्या तरुणांनी याकामी गेल्या २००७ मध्ये पुढाकार घेवून जंगल वणव्यांपासून आपल्या गावाचे आणि नैसर्गिक संपत्तीसह वन्यजीवांचे रक्षण करण्याचे धाडसी काम सुरू केले आणि आज त्यातून मोठे यश प्राप्त झाले आहे.महाड तालुक्यात अत्यंत दुर्गम डोंगर भागात वसलेले भिवघर हे जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव. सारेच शेतकरी. डोंगराच्या कुशीत विसावलेल्या या गावाच्या शेजारील डोंगरावर २०१२ मध्ये एक मोठा जंगल वणवा लागला आणि पाहतापाहता तो खाली गावात येवून पोहोचला. त्यात जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींच्या १० ते १२ झोपड्या त्यातील संसारासह जळून भस्मसात झाल्या. त्या आदिवासी कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. याच दुर्दैवी घटनेअंती ग्रामस्थ आणि काही तरुणांनी यापुढे वणवा लागूच द्यायचा नाही आणि लागलाच तर पुन्हा आपल्या गावापर्यंत पोहचू द्यायचा नाही असा पक्का निर्धार केला आणि त्या कामाला सुरुवात केल्याचे वणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रम अमलात आणलेल्या भिवघर वनप्रेमी संघटनेचे प्रमुख किशोर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जंगलातील जाळ रेषा व पाण्याच्या टाक्यांतूनवणवे नियंत्रण मिळवण्यात यशवणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रमाचे स्वरूप सांगताना पवार म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसात गावापासून जवळच असलेल्या डोंगरावर ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करून तरुण मंडळी जातात. जाताना डोक्यावर पाण्याचे ड्रम घेवून जातात. तेथे संभाव्य वणव्याच्या जाळरेषा आखल्या जातात. जाळरेषा म्हणजे, वणवा लागलाच तर इतरत्र पसरू नये यासाठी डोंगरमाथ्यावरील वाढलेले गवत एका ठरावीक अंतरावर कापले जाते. तेथे पडलेला सुका पालापाचोळा उचलला जातो. त्यामुळे वणवा पेटलाच तर पुढे पसरत नाही. शिवाय तेथे छोट्या पाण्याच्या साठवण टाक्या बांधल्या आहेत त्यात सोबत नेलेल्या ड्रममधील पाणी साठवून ठेवले जाते. चुकून कधी वणवा लागलाच तर तो विझवण्यासाठी त्या पाण्याचा वापर करता येतो.उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या दिवसात वरच्या जंगल भागात वावरणाºया वन्यजीवांची तहान या साठवण टाक्या भागवतात आणि ते वन्यप्राणी गावांत येत नाहीत. तरुणांच्या या अभिनव उपक्रमामुळे वणवे रोखले जावून वनसंपदा टिकून राहिली आहे. या भागातील लोक जंगलातून आंबे(कैरी) आणून विक्रीचा व्यवसाय करतात. वणवे रोखल्यामुळे जंगलभागात पिकणारा रानमेवाही वाचला आहे. त्यातून स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला आहे. गेल्या बारा वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांती दिसेनासे झालेले प्राणी-पक्षी जंगलात पुन्हा वास्तव्यास आले आहेत.वनविभाग वा शासकीय यंत्रणेस मात्रकल्पना नाहीसद्यस्थितीत भिवघरचा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला दिसतो. मोर, ससे, भेकर यासारखे प्राणी, असंख्य पक्षी पुन्हा या परिसरात दिसू लागले आहेत. संपूर्ण परिसर रान, वृक्ष, वेलींनी भारून गेला आहे. विहिरी, तलावांची पाण्याची पातळी वाढली, आदिवासी बांधवांना रोजगार मिळू लागला. ही निसर्गाची कृपा असली तरी खरी किमया या तरुणांच्या वणवा विरोधी अभियानाचीच आहे, याची दखल मात्र अद्याप वनविभाग वा कोणत्याही शासकीय यंत्रणेने घेतलेली नाही.नैसर्गिक जलपातळीत वाढ, पाणी टँकर बंदवणवे आणि वृक्षतोड थांबल्याने जमिनीतील नैसर्गिक जलपातळी वृद्धिंगत होवून, गावातील विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत विहिरींना पाणी असते. परिणामी उन्हाळी पाणीटंचाई अंतर्गत गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत नसल्याचे भिवघर वनप्रेमी संघटनेचे श्याम गायकवाड यांनी सांगितले.गेल्या पाच वर्षांत जंगलात वणवा नाहीकिशोर पवार आणि श्याम गायकवाड या जिद्दी तरुणांच्या सोबतीने गावातील तरुण व आदिवासी यांची वनप्रेमी संघटना उभी राहिली आणि वणव्याशी झुंज सुरू झाली. रात्री ९ ते १२ या वेळेस जंगलात जावून जाळ रेषा मारून वणवा पसरण्याची प्रक्रिया त्यांनी खंडित केली. आता वणवा पूर्णपणे थांबला आहे. मध्येच कधी वणवा लागला तर गावांतील आदिवासी व तरुण तत्काळ जंगलात धावत जावून त्यावर नियंत्रण मिळवितात. गेल्या पाच वर्षांपासून जंगल वणव्यापासून दूर ठेवून या तरुणांनी एक आगळा आदर्शच निर्माण केला.