शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

कोकणातील जंगल वणवे रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:10 IST

कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.

जयंत धुळप अलिबाग : कोकणात सर्वत्र वर्षानुवर्षे डोंगर भागात वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती व वन्यजीवांची मोठी हानी होत असते. वनविभाग वा अन्य कोणतीही शासन यंत्रणा वणवे थांबविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. मात्र, भिवघरच्या तरुणांनी याकामी गेल्या २००७ मध्ये पुढाकार घेवून जंगल वणव्यांपासून आपल्या गावाचे आणि नैसर्गिक संपत्तीसह वन्यजीवांचे रक्षण करण्याचे धाडसी काम सुरू केले आणि आज त्यातून मोठे यश प्राप्त झाले आहे.महाड तालुक्यात अत्यंत दुर्गम डोंगर भागात वसलेले भिवघर हे जेमतेम तीन हजार लोकसंख्येचे गाव. सारेच शेतकरी. डोंगराच्या कुशीत विसावलेल्या या गावाच्या शेजारील डोंगरावर २०१२ मध्ये एक मोठा जंगल वणवा लागला आणि पाहतापाहता तो खाली गावात येवून पोहोचला. त्यात जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींच्या १० ते १२ झोपड्या त्यातील संसारासह जळून भस्मसात झाल्या. त्या आदिवासी कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. याच दुर्दैवी घटनेअंती ग्रामस्थ आणि काही तरुणांनी यापुढे वणवा लागूच द्यायचा नाही आणि लागलाच तर पुन्हा आपल्या गावापर्यंत पोहचू द्यायचा नाही असा पक्का निर्धार केला आणि त्या कामाला सुरुवात केल्याचे वणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रम अमलात आणलेल्या भिवघर वनप्रेमी संघटनेचे प्रमुख किशोर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जंगलातील जाळ रेषा व पाण्याच्या टाक्यांतूनवणवे नियंत्रण मिळवण्यात यशवणवा आणि वृक्षतोड प्रतिबंध उपक्रमाचे स्वरूप सांगताना पवार म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसात गावापासून जवळच असलेल्या डोंगरावर ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करून तरुण मंडळी जातात. जाताना डोक्यावर पाण्याचे ड्रम घेवून जातात. तेथे संभाव्य वणव्याच्या जाळरेषा आखल्या जातात. जाळरेषा म्हणजे, वणवा लागलाच तर इतरत्र पसरू नये यासाठी डोंगरमाथ्यावरील वाढलेले गवत एका ठरावीक अंतरावर कापले जाते. तेथे पडलेला सुका पालापाचोळा उचलला जातो. त्यामुळे वणवा पेटलाच तर पुढे पसरत नाही. शिवाय तेथे छोट्या पाण्याच्या साठवण टाक्या बांधल्या आहेत त्यात सोबत नेलेल्या ड्रममधील पाणी साठवून ठेवले जाते. चुकून कधी वणवा लागलाच तर तो विझवण्यासाठी त्या पाण्याचा वापर करता येतो.उन्हाळ्याच्या पाणीटंचाईच्या दिवसात वरच्या जंगल भागात वावरणाºया वन्यजीवांची तहान या साठवण टाक्या भागवतात आणि ते वन्यप्राणी गावांत येत नाहीत. तरुणांच्या या अभिनव उपक्रमामुळे वणवे रोखले जावून वनसंपदा टिकून राहिली आहे. या भागातील लोक जंगलातून आंबे(कैरी) आणून विक्रीचा व्यवसाय करतात. वणवे रोखल्यामुळे जंगलभागात पिकणारा रानमेवाही वाचला आहे. त्यातून स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला आहे. गेल्या बारा वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांती दिसेनासे झालेले प्राणी-पक्षी जंगलात पुन्हा वास्तव्यास आले आहेत.वनविभाग वा शासकीय यंत्रणेस मात्रकल्पना नाहीसद्यस्थितीत भिवघरचा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला दिसतो. मोर, ससे, भेकर यासारखे प्राणी, असंख्य पक्षी पुन्हा या परिसरात दिसू लागले आहेत. संपूर्ण परिसर रान, वृक्ष, वेलींनी भारून गेला आहे. विहिरी, तलावांची पाण्याची पातळी वाढली, आदिवासी बांधवांना रोजगार मिळू लागला. ही निसर्गाची कृपा असली तरी खरी किमया या तरुणांच्या वणवा विरोधी अभियानाचीच आहे, याची दखल मात्र अद्याप वनविभाग वा कोणत्याही शासकीय यंत्रणेने घेतलेली नाही.नैसर्गिक जलपातळीत वाढ, पाणी टँकर बंदवणवे आणि वृक्षतोड थांबल्याने जमिनीतील नैसर्गिक जलपातळी वृद्धिंगत होवून, गावातील विहिरींच्या जलपातळीत वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत विहिरींना पाणी असते. परिणामी उन्हाळी पाणीटंचाई अंतर्गत गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत नसल्याचे भिवघर वनप्रेमी संघटनेचे श्याम गायकवाड यांनी सांगितले.गेल्या पाच वर्षांत जंगलात वणवा नाहीकिशोर पवार आणि श्याम गायकवाड या जिद्दी तरुणांच्या सोबतीने गावातील तरुण व आदिवासी यांची वनप्रेमी संघटना उभी राहिली आणि वणव्याशी झुंज सुरू झाली. रात्री ९ ते १२ या वेळेस जंगलात जावून जाळ रेषा मारून वणवा पसरण्याची प्रक्रिया त्यांनी खंडित केली. आता वणवा पूर्णपणे थांबला आहे. मध्येच कधी वणवा लागला तर गावांतील आदिवासी व तरुण तत्काळ जंगलात धावत जावून त्यावर नियंत्रण मिळवितात. गेल्या पाच वर्षांपासून जंगल वणव्यापासून दूर ठेवून या तरुणांनी एक आगळा आदर्शच निर्माण केला.