शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

‘शासन आपल्या दारी’मुळे काहींना पोटशूळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 07:55 IST

"या उपक्रमातून आतापर्यंत अडीच कोटी जनतेला लाभ मिळवून दिला असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी’ हा राजकीय नसून शासकीय कार्यक्रम आहे."

अलिबाग : पूर्वी सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी अवस्था होती. आता सरकारच जनतेच्या दारात जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत अडीच कोटी जनतेला लाभ मिळवून दिला असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी’ हा राजकीय नसून शासकीय कार्यक्रम आहे. मात्र, काही जणांच्या पोटात पोटशूळ उठत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. 

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणेरे येथे झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा घेण्यात आला. शासन आपल्या दारी कार्यक्रमात विविध विभागातील लाभार्थींना मिळालेल्या लाभाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तळीये दरडग्रस्तांना बांधण्यात आलेल्या ६६ घरांच्या चाव्याही देण्यात आल्या. 

विकासाच्या घोषणा-  रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीसाठी पन्नास कोटींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. -  माणगाव नगर पंचायत नव्या इमारती १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. -  पावनखिंड येथे पायी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी विश्रामगृह बांधण्यात येणार असून १५ कोटी मंजूर केले आहेत. -  सिंदखेड येथे स्मारकास १५ कोटी मंजूर केले आहेत. -  कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटी दिले असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. 

डेटा सेंटरमुळे विकास : फडणवीसरायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारे प्रकल्प येत आहेत. रायगड, नवी मुंबई ही डेटा सेंटरची राजधानी होणार आहे. पुढील काळात चित्र बदलत आहे. सामान्यांचा विचार केला आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

जमिनी विकू नका : अजित पवाररायगडला निसर्गाने भरभरून दिले आहे. पुणेकरही रायगडच्या प्रेमात पडले आहेत. जिल्ह्यातील जेट्टीचे जाळे आम्ही तयार करीत आहोत. जिल्ह्यातच रोजगारनिर्मितीचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे जमिनी विकू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

‘चाकरमानी पुन्हा गावात आला पाहिजे’छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य केले. त्याच धर्तीवर सरकार हे जनतेच्या दारी जात असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोकणातील स्थलांतराच्या मुद्द्याला हात घालत, कोकण म्हणजे समुद्र, निसर्ग, जंगल, मंदिर यांनी नटलेला आहे.  कोकणात विकास साधून येथील तरुणांना आपल्या गावातच रोजगार प्राप्त करून देण्याचा आमचा मानस आहे, अस सरकारकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार