शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

‘शासन आपल्या दारी’मुळे काहींना पोटशूळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 07:55 IST

"या उपक्रमातून आतापर्यंत अडीच कोटी जनतेला लाभ मिळवून दिला असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी’ हा राजकीय नसून शासकीय कार्यक्रम आहे."

अलिबाग : पूर्वी सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी अवस्था होती. आता सरकारच जनतेच्या दारात जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत अडीच कोटी जनतेला लाभ मिळवून दिला असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी’ हा राजकीय नसून शासकीय कार्यक्रम आहे. मात्र, काही जणांच्या पोटात पोटशूळ उठत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. 

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणेरे येथे झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा घेण्यात आला. शासन आपल्या दारी कार्यक्रमात विविध विभागातील लाभार्थींना मिळालेल्या लाभाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तळीये दरडग्रस्तांना बांधण्यात आलेल्या ६६ घरांच्या चाव्याही देण्यात आल्या. 

विकासाच्या घोषणा-  रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीसाठी पन्नास कोटींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. -  माणगाव नगर पंचायत नव्या इमारती १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. -  पावनखिंड येथे पायी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी विश्रामगृह बांधण्यात येणार असून १५ कोटी मंजूर केले आहेत. -  सिंदखेड येथे स्मारकास १५ कोटी मंजूर केले आहेत. -  कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटी दिले असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. 

डेटा सेंटरमुळे विकास : फडणवीसरायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारे प्रकल्प येत आहेत. रायगड, नवी मुंबई ही डेटा सेंटरची राजधानी होणार आहे. पुढील काळात चित्र बदलत आहे. सामान्यांचा विचार केला आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

जमिनी विकू नका : अजित पवाररायगडला निसर्गाने भरभरून दिले आहे. पुणेकरही रायगडच्या प्रेमात पडले आहेत. जिल्ह्यातील जेट्टीचे जाळे आम्ही तयार करीत आहोत. जिल्ह्यातच रोजगारनिर्मितीचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे जमिनी विकू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

‘चाकरमानी पुन्हा गावात आला पाहिजे’छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य केले. त्याच धर्तीवर सरकार हे जनतेच्या दारी जात असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोकणातील स्थलांतराच्या मुद्द्याला हात घालत, कोकण म्हणजे समुद्र, निसर्ग, जंगल, मंदिर यांनी नटलेला आहे.  कोकणात विकास साधून येथील तरुणांना आपल्या गावातच रोजगार प्राप्त करून देण्याचा आमचा मानस आहे, अस सरकारकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार