शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

श्रीवर्धनमध्ये मच्छीमारांचा आक्रोश, नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 02:40 IST

या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला.

श्रीवर्धन : या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला. त्याचे दूरगामी परिणाम रायगड जिल्ह्यातील मासेमारी करणाºया लोकांच्या जीवनावर झाले आहेत.यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतक-याला एकरी मदत देण्यात आली आहे; त्याच धर्तीवर मासेमारी करणाऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी श्रीवर्धनमधील मासेमारी करणाºयांनी केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता श्रीवर्धन तालुक्यातील कोळी समाजाने नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढत श्रीवर्धन तालुक्यात मत्स्य दुष्काळ जाहीर करावा असे फलक घेऊन शासन दरबारी आपला आक्रोश व्यक्त केला. या पदयात्रेत तालुक्यातील कोळी समाजातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.डिझेल सबसिडी मिळावी, शेतक-यांप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, उपजीविकेचे दुसरे साधन उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कोळी समाजाच्या विविध नेत्यांनी समाजाला संबोधित करताना व्यक्त केली. श्रीवर्धन कुणबी समाज सभागृहात तालुक्यातील सर्व मच्छीमार संघटनानी पत्रकारांशी संवाद साधत आपल्या व्यथा व्यक्त मांडल्या. तहसीलदार सचिन गोसावी यांना सर्व मासेमारी करणाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दुपारी १ च्या सुमारास दिले. त्यापूर्वी श्रीवर्धन शिवसेना कार्यकारिणीने ११ वाजता मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन सादर केले. शिवसेनेकडून तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर, सुयोग लांगी, जुनेद दुस्ते, नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर व कोळी समाज आणि मासळी व्यावसायिकांच्या वतीने रामचंद्र वाघे, दिनेश चोगले, यशवंत चौलकर, इम्तियाज कोळपे, हरिदास वाघे, नंदू रघुवीर, भास्कर चौलकर, सायब हंमदुल्ले यांनी निवेदन दिले.वादळाने मच्छीमारांचे नुकसानगेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. पावसाळ्यात बोटीची डागडुजी व नवनिर्मिती केली जाते. साधारणत: बोटीच्या आकारानुसार ५० हजारांपासून ते २ लाखांपर्यंतचा खर्च बोट निर्मितीसाठी येतो. मासेमारी करण्यासाठी जाळे प्रत्येक वर्षी नवीन बनवले जाते किंवा जुन्या जाळ्याची खर्च करून दुरुस्ती केली जाते. बोटींवर काम करणाºया खलाशांना आगाऊ रक्कम दिली जाते. या वर्षी आलेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळांनी मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या जनसामान्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले आहे. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासे मिळत नाहीत; पूर्वी ५ वावापर्यंत जाऊन मासे मिळत होते, आता १२ वावाच्या पुढे जाऊनसुद्धा मासे मिळत नाहीत, असे चंद्रकांत वाघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या वर्षी मासळी मिळत नसल्याने कोळी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारी हा कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. सरकारने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे .- भारत चोगले,व्यावसायिक, श्रीवर्धनक्यार, महा वादळामुळे तसेच सतत बदलणाºया हवामानामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहेत. कोळी समाजाने त्यांची ही व्यथा, अडचण निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. हे निवेदन तत्काळ वरिष्ठ पातळीवर पाठवले जाईल.- सचिन गोसावी,तहसीलदार, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार