शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

संविधान बदलण्याचे भाजपाचे षड्यंत्र हाणून पाडा- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:55 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शपथ घेऊन सर्वाेच्चपदी विराजमान होणारे नेते आता संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत.

अलिबाग : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शपथ घेऊन सर्वाेच्चपदी विराजमान होणारे नेते आता संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. भाजपाचे लोकसभेतील सदस्य आणि मंत्री घेतलेल्या शपथेशी प्रतारणा करीत आहेत. संविधान बदलण्याचे भाजपाचे हे षड्यंत्र सर्वांनी मिळून हाणून पाडणे गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.कोकण विभागातील संविधान बचाव अभियानाची सांगता रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झाली, त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेच्या न्यायाचा हुंकार दिला होता. त्याच पवित्र भूमीत संविधान वाचवण्याचे अभियान राबवण्याची वेळ भाजपा सरकारमुळे आली आहे. देशाची सूत्रे ज्यांच्या हातामध्ये आहेत, त्यांचा संविधानावर विश्वास नाही, तेच आता घटना बदलण्याची भाषा करीत आहेत. हे देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोकादायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून देशातील महिलाशक्तीने एकजुटीने भाजपाचे मनसुबे उधळून लावावेत, असे आवाहन पवार यांनी केले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे, राष्ट्रीय महिला आघाडीच्या प्रमुख फौजिया खान यांनीही आपले विचार मांडले. या प्रसंगी आमदार विद्या चव्हाण, आमदार सुरेश लाड, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विद्या चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचे दहन केले.>राम मंदिरासाठी घरे उद्ध्वस्त का करता?राम मंदिराच्या मुद्द्यावर आयोध्येमधील एक शिष्टमंडळ भेटले. त्यांनी सांगितले राम मंदिराचे काम सुरू होणार आहे. मंदिराला आमचा विरोध नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले; परंतु मंदिर परिसरातील सुमारे अर्धा किलोमीटर परिघातील इमारती पाडून तेथे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रामाच्या नावाने मंदिर बांधायचे, त्यासाठी आजूबाजूच्या लोकांची घरे उद्ध्वस्त करून रामाला जसा वनवास भोगाला लागला तसा वनवास तेथील लोकांना भोगावा लावायचा आणि रामाबद्दलचे प्रेम दाखवायचे हे काही योग्य नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार