शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यातील बीजगुणन केंद्राची सात एकर जमीन ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 01:27 IST

निधीअभावी यंत्रणा धूळ खात पडून

दासगाव :  शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या तालुका बीजगुणन केंद्राला शासनाने गेल्या  चार वर्षांत निधी न दिल्याने  विविध उपक्रमांपासून हे केंद्र दुर्लक्षित आहे. येथील शेतीची आधुनिक यंत्रणादेखील धूळ खात पडून आहे. निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या या केंद्रात पाच वर्षांपासून  भात बियाणांचे उत्पादनच झालेले नाही, त्यामुळे सुमारे साडेसात एकर जमीन ओसाड पडली आहे.

महाड तालुक्यात कृषी विभागाकडून निर्माण करण्यात आलेल्या तालुका बीजगुणन केंद्राला गेल्या काही वर्षांत निधी उपलब्ध न झाल्याने याठिकाणी  भात बियाणांचे उत्पादन यावर्षी झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या केंद्रातून भात बियाणे उपलब्ध न झाल्याने खासगी भात बियाणे अधिक पैसे मोजून विकत घ्यावे लागत आहे. साडेसात एकर परिसरात पसरलेल्या या तालुका बीजगुणन केंद्रात भात बियाणांचे उत्पादन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, गांडूळ खत निर्मिती, फळबाग आदी घटकांचा समावेश आहे. याठिकाणी प्रतिवर्षी जवळपास १३५ ते १४० क्विंटल भात बियाणे निर्मिती केली जात होती. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार किंवा बाजारात मागणी असलेली  भात बियाणे याठिकाणी उत्पादन करून शेतकऱ्यांना सवलतीने हे भात बियाणे पुरवठा केले जात होते. यामाध्यमातून केंद्राला अंदाजे पाच लक्ष रुपये प्राप्त होत होते. या बियाणांच्या उत्पादनाकरिता लागणाऱ्या सामग्रीसाठी निधीची आवश्यकता असते; मात्र गेली दोन वर्षे निधी न मिळाल्याने यावर्षी भात बियाणे उत्पादन झाले नाही. या  बीजगुणन केंद्रावर उत्पादित केले जाणारे कर्जत २ आणि कर्जत ६ या भात बियाणांना मोठी मागणी आहे.

बीजगुणन केंद्र  महाडपासून सुमारे चार किमी अंतरावर आहे. मात्र हे केंद्र महामार्ग आणि महाडपासून आडमार्गावर असल्याने शेतकऱ्यांना याठिकाणी जाण्या-येण्याकरिता वाहनांची सुविधा नाही. वयोवृद्ध शेतकरी या केंद्रापर्यंत जात नाहीत. काळाच्या ओघात या बीजगुणन केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यात या  केंद्रांची अवस्था बिकट होत चालली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात हरितक्रांतीची सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील सुधारित बियाणांची आणि प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन या केंद्रांची निर्मिती झाली, मात्र आधुनिक काळात बियाणे तयार करणाऱ्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात बीजगुणन केंद्रात भात बियाणे उपलब्ध झाले नाही, तर खासगी कंपन्यांच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांना निर्भर राहावे लागेल.

स्थानिक पातळीवर कृषी विभागाची साडेसात एकर जनीन विनावापर ओसाड पडून   आहे. विविध प्रकारचे कृषी प्रकल्प या जागेत उभे करून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केंद्र म्हणून पर्याय उभा करता येऊ शकतो. याशिवाय आधुनिक शेती आणि शेतीपूरक प्रकल्प आणि त्यांचे प्रयोग याठिकाणी उभे करणे आवश्यक आहे. महाड, पोलादपूरमधील शेतकऱ्यांना या केंद्रातून मार्गदर्शन आणि लागणारी  कृषी यंत्रणा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय  दूर होईल. मात्र स्थानिक आमदारांचे दुर्लक्षदेखील या केंद्राच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे. साडेसात एकरमध्ये शासनाने उत्तम प्रतीचे कृषीप्रकल्प, नर्सरी, फूल उत्पादन असे प्रकल्प उभे केल्यास कृषी पर्यटनाला याठिकाणी नक्कीच चालना मिळेल.