शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय मुलांच्या गुणवत्तेचा शोध घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 05:05 IST

रविवारी अलिबागमध्ये आयोजन : जिल्ह्यातील ४० शाळांमधून १८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

विशेष प्रतिनिधीअलिबाग : परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी लायन्स क्लब या संस्थेच्या माध्यमातून आयोजित ‘टॅलेंट हंट’ या बहुचर्चित स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि. १८ नोव्हेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी माजी लष्करी अधिकारी कॅ. स्मिता गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पात्र विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार असून, अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पीएनपी नाट्यगृहात त्याच दिवशी संध्याकाळी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष नयन कवळे यांनी दिली आहे.

भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणाला तोंड देण्याच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यासाठी आखण्यात आलेली ही स्पर्धा तीन टप्प्यामध्ये घेण्यात येते. सोमवार दि. २७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अलिबाग, रेवदंडा, मांडवा, पोयनाड, रेवस परिसरातील ४० शाळांमधून १८ हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या टप्पात सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्नावर आधारित १५ मिनिटांच्या परीक्षेत प्रत्येकी २ गुणांचे १० प्रश्न होते. या फेरीत सहभागी झालेल्या १८ हजार विद्यार्थ्यांमधून ५५० विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

रविवार दि. ३० सप्टेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात संपन्न झालेल्या दुसºया टप्प्यातील मुख्य परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेची चाचणी घेतली गेली. या मुख्य परीक्षेच्या गुणांकनानुसार दोन्ही गटातील ५० यशस्वी विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा शानदार गौरव१८ नोव्हेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात होणार असलेल्या अंतिम फेरीमध्ये माजी लष्करी अधिकारी कॅ. स्मिता गायकवाड, आरसीएफचे महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, जेएसडब्ल्यूचे महाव्यवस्थापक प्रणव दीक्षित, बालमानसोपचारतज्ञ नंदिनी गोरे, नामवंत विधिज्ञ सुरेंद्र जोशी,समुपदेशक प्राची देशमुख हे विविध विषयातील तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्ती या यशस्वी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतील. विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता, सामान्य ज्ञान, हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तपणा याची चाचणी या मुलाखतीत घेतली जाईल. यातील निवडक यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव याच दिवशी संध्याकाळी ५.३०वाजता पीएनपी नाट्यगृहात समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. अंतिम फेरी बक्षीस वितरण समारंभास अलिबाग परिसरातील सुजाण नागरिक, पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक लायन नयन कवळे यांनी केले आहे. 

टॅग्स :Schoolशाळाalibaugअलिबाग