शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शालेय मुलांच्या गुणवत्तेचा शोध घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 05:05 IST

रविवारी अलिबागमध्ये आयोजन : जिल्ह्यातील ४० शाळांमधून १८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

विशेष प्रतिनिधीअलिबाग : परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी लायन्स क्लब या संस्थेच्या माध्यमातून आयोजित ‘टॅलेंट हंट’ या बहुचर्चित स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि. १८ नोव्हेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी माजी लष्करी अधिकारी कॅ. स्मिता गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पात्र विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार असून, अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पीएनपी नाट्यगृहात त्याच दिवशी संध्याकाळी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष नयन कवळे यांनी दिली आहे.

भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणाला तोंड देण्याच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यासाठी आखण्यात आलेली ही स्पर्धा तीन टप्प्यामध्ये घेण्यात येते. सोमवार दि. २७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अलिबाग, रेवदंडा, मांडवा, पोयनाड, रेवस परिसरातील ४० शाळांमधून १८ हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या टप्पात सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्नावर आधारित १५ मिनिटांच्या परीक्षेत प्रत्येकी २ गुणांचे १० प्रश्न होते. या फेरीत सहभागी झालेल्या १८ हजार विद्यार्थ्यांमधून ५५० विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

रविवार दि. ३० सप्टेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात संपन्न झालेल्या दुसºया टप्प्यातील मुख्य परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेची चाचणी घेतली गेली. या मुख्य परीक्षेच्या गुणांकनानुसार दोन्ही गटातील ५० यशस्वी विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा शानदार गौरव१८ नोव्हेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात होणार असलेल्या अंतिम फेरीमध्ये माजी लष्करी अधिकारी कॅ. स्मिता गायकवाड, आरसीएफचे महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, जेएसडब्ल्यूचे महाव्यवस्थापक प्रणव दीक्षित, बालमानसोपचारतज्ञ नंदिनी गोरे, नामवंत विधिज्ञ सुरेंद्र जोशी,समुपदेशक प्राची देशमुख हे विविध विषयातील तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्ती या यशस्वी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतील. विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता, सामान्य ज्ञान, हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तपणा याची चाचणी या मुलाखतीत घेतली जाईल. यातील निवडक यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव याच दिवशी संध्याकाळी ५.३०वाजता पीएनपी नाट्यगृहात समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. अंतिम फेरी बक्षीस वितरण समारंभास अलिबाग परिसरातील सुजाण नागरिक, पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक लायन नयन कवळे यांनी केले आहे. 

टॅग्स :Schoolशाळाalibaugअलिबाग