शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शालेय मुलांच्या गुणवत्तेचा शोध घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 05:05 IST

रविवारी अलिबागमध्ये आयोजन : जिल्ह्यातील ४० शाळांमधून १८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

विशेष प्रतिनिधीअलिबाग : परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी लायन्स क्लब या संस्थेच्या माध्यमातून आयोजित ‘टॅलेंट हंट’ या बहुचर्चित स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि. १८ नोव्हेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी माजी लष्करी अधिकारी कॅ. स्मिता गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पात्र विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार असून, अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पीएनपी नाट्यगृहात त्याच दिवशी संध्याकाळी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष नयन कवळे यांनी दिली आहे.

भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणाला तोंड देण्याच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यासाठी आखण्यात आलेली ही स्पर्धा तीन टप्प्यामध्ये घेण्यात येते. सोमवार दि. २७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अलिबाग, रेवदंडा, मांडवा, पोयनाड, रेवस परिसरातील ४० शाळांमधून १८ हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या टप्पात सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्नावर आधारित १५ मिनिटांच्या परीक्षेत प्रत्येकी २ गुणांचे १० प्रश्न होते. या फेरीत सहभागी झालेल्या १८ हजार विद्यार्थ्यांमधून ५५० विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

रविवार दि. ३० सप्टेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात संपन्न झालेल्या दुसºया टप्प्यातील मुख्य परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेची चाचणी घेतली गेली. या मुख्य परीक्षेच्या गुणांकनानुसार दोन्ही गटातील ५० यशस्वी विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा शानदार गौरव१८ नोव्हेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात होणार असलेल्या अंतिम फेरीमध्ये माजी लष्करी अधिकारी कॅ. स्मिता गायकवाड, आरसीएफचे महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, जेएसडब्ल्यूचे महाव्यवस्थापक प्रणव दीक्षित, बालमानसोपचारतज्ञ नंदिनी गोरे, नामवंत विधिज्ञ सुरेंद्र जोशी,समुपदेशक प्राची देशमुख हे विविध विषयातील तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्ती या यशस्वी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतील. विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता, सामान्य ज्ञान, हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तपणा याची चाचणी या मुलाखतीत घेतली जाईल. यातील निवडक यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव याच दिवशी संध्याकाळी ५.३०वाजता पीएनपी नाट्यगृहात समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. अंतिम फेरी बक्षीस वितरण समारंभास अलिबाग परिसरातील सुजाण नागरिक, पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक लायन नयन कवळे यांनी केले आहे. 

टॅग्स :Schoolशाळाalibaugअलिबाग