शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

रोहा-दिवा शटल लवकरच १५ डब्यांची : रेल्वेमंत्र्यांची प्रवाशांना विशेष भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 3:50 AM

रायगड जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची नुकतीच भेट घेतली.

अलिबाग - रायगड जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची नुकतीच भेट घेतली. त्यामध्ये रोहा-दिवा शटल सेवेच्या फेºया वाढवून त्यांची डब्यांची संख्या १५ करणे, त्याचप्रमाणे अंतर्गत येणाºया स्टेशनमधील फलाटांची लांबी वाढवण्याला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्याचप्रमाणे पनेवल रेल्वेस्टेशनला अत्याधुनिक सुविधा देणे, पेण रेल्वेस्टेशनमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, यालाही त्यांनी मान्यता दिली आहे. रायगडकरांना १५ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला चांगलीच भेट मिळाल्याचे अधोरेखित होत आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील रेल्वे संबंधीचे अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याने त्यांच्या सोबतची भेट सकारात्मक ठरली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप यांनी पत्रकार परिषदेत दिली. पेण रेल्वेस्टेशनमध्ये लांबपल्ल्यांच्या गाड्यांना प्रवासी भेटत नसल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने पुढे केले जात होते. जिल्ह्यात नागरीकरण वाढले आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांची संख्या लक्षणीय झाली असल्याने पेण रेल्वेस्टेशनवर लांबपल्ल्यांच्या गाड्या थांबणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्याच्या निर्दशनास आणून दिले. प्रवाशांबाबतचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या असल्याचे धारप यांनी सांगितले.दिवा-रोहा या गाडीवरच प्रवाशांची मदार आहे, त्यामुळे त्या गाड्यांची वाढ होणे गरजेचे असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार प्रवासाचा हंगाम संपल्यानंतर दिवा-रोहासाठी एक जादा गाडी देण्याचे गोयल यांनी मान्य केले आहे, त्यामुळे रायगडकरांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.रेल्वे फाटकांवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात, त्यामुळे रेल्वे फाटक ही संकल्पना रायगड जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील २४ ठिकाणांच्या रेल्वे फाटकांवर ओव्हर ब्रिज उभारण्याचे आदेश गोयल यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. पनवेल रेल्वेस्टेशनला उच्च श्रेणीचा दर्जा तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कालावधीत देण्यात आला होता. मात्र, त्या प्रमाणात सोयी-सुविधा पनवेल स्टेशनमध्ये पुरवण्यात आल्या नव्हत्या. आता नव्याने महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र उच्च दर्जाचे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वातानुकूलित विश्रांतीगृह, तेथील आसन व्यवस्था लवकरच पुरवण्यात येणार आहे. पनवेल स्टेशनमधील दोन ठिकाणी सरकते जिने आणि लिफ्टची सुुविधा २ आॅक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. उर्वरित चार ठिकाणचे सरकते जिने टप्प्याटप्प्याने उभारणार आहेत. पत्रकार परिषदेला अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, परशुराम म्हात्रे, सतीश लेले, प्रवक्ते मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.रोहा- दिवाला १२ ऐवजी १५ डबेरोहा-दिवा शटल सेवेच्या फेºया वाढवून त्यांची डब्यांची संख्या १५ करण्यात येण्याला रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याने त्या अंतर्गत येणाºया स्टेशनमधील दिवा, दातिवली, निळजे, नावाडे, पनवेल यासह अन्य फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी रुपये रेल्वे खर्च करणार आहे.विशेष साहाय्यता निधीसाठी ५० कोटीआपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी विशेष साहाय्यता निधीसाठी ५० कोटी रुपयांची मागणी पालकमंत्री यांनी सरकारकडे केली आहे.पिंजºयांतील मत्स्यपालनावर भरतरुणांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पिंजºयातील मत्स्यपालन ही नवीन संकल्पना जिल्ह्यात रुजू पाहत आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची या योजनेतून आर्थिक भरभराट होण्यास मदत मिळणार आहे.पेण रेल्वेस्थानकामधून मिळणार रिटर्न तिकीटपेणवरून शिवाजी टर्मिनलकडे जाण्यासाठी एकेरी प्रवासाचे तिकीट दिले जाते; पंरतु रिटर्न तिकीट दिले जात नव्हते. पेणला सबअर्बन वर्गात गणले जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. तिकीट विभागातील तांत्रिक बदल दुरुस्त करून तीही सुविधा आता रायगडकरांना मिळणार आहे.माथेरानची ट्रेन मिनी गेज आहे, त्यामुळे मुंबईकडे जाताना ब्रॉड गेज ट्रेन आहेत, त्यामुळे प्रवाशांना दोन वेळा तिकीट काढावे लागायचे. त्यामध्ये त्यांचा वेळ खर्च व्हायचा यावर उपाय म्हणून आता माथेरानच्या तिकीट खिडकीवर लवकरच सर्वच लोकलचे तिकीट १ जानेवारी २०१९ पासून उपलब्ध करून दिले जाणार आहे.खारबंदिस्तीच्या कामांना ६० कोटी रुपयेरायगड जिल्ह्यातील खारबंदिस्तीचा प्रश्न फार गंभीर आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये एकाही पालकमंत्र्यांनी सभागृहात कपातसूचना मांडलेली नाही. त्यामुळे यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात अडथळा येत होताा; परंतु आता जिल्ह्यातील खारबंदिस्तीच्या कामांना तब्बल ६० कोटी रुपये मिळणार आहेत. याचा फायदा अलिबाग, पेण तालुक्यांना सर्वाधिक प्रमाणात होणार आहे. पनवेल तालुक्यातील केळवणे आणि मोठी जुई हे सिडकोच्या अखत्यारीत असल्याने तेथे गेलेल्या खारबंदिस्तीसाठी सिडकोने पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. ज्या गावातील खांडी जाऊन शेत उद्ध्वस्त झाले आहेत. त्या शेतकºयांना अन्न सुरक्षा कायद्याचे कवच देण्यात येणार आहे.जिल्ह्यात उभारणार फोम बँकरायगड जिल्हा हा उद्योगांचा जिल्हा आहे, येथे मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी आपले जाळे विस्तारलेले आहे. त्यामध्ये केमिकल कंपन्यांचा अधिक भरणा आहे. काही दिवसांपूर्वीच रोहे एमआयडीसीमधील कंपनीमध्ये स्फोट झाला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याबरोबरच फोमची आवश्यकता असते. जिल्ह्यात मध्यवर्ती ठकाणी फोम बँक उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRaigadरायगड