शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

चरी-गोपचरी आणि शहापूर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:41 IST

कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक होण्याच्या समस्येला आळा घालण्याकरिता...

- जयंत धुळपअलिबाग  - कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे ग्रामस्थ शेतकºयांना आता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करता येणे शक्य आहे. समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटून हजारो एकर भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून ती नापीक होण्याच्या समस्येला आळा घालण्याकरिता, हे समुद्र संरक्षक बंधारे रोजगार हमी योजनेतून दुरुस्त करून स्थानिक ग्रामस्थांना त्यांच्याच गावात रोजगार आणि भातशेतीचे रक्षण असा दुहेरी हेतू साध्य करण्याकरिता समुद्र संरक्षक बंधाºयांची कामे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घेण्याचा, श्रमिक मुक्ती दलाच्या शहापूर, धेरंड गावांतील शेतकरी शिष्टमंडळास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेला शब्द वास्तवात उतरला आहे.रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खारभूमी विकास विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेवून याबाबत विचार विनिमय करून संरक्षक बंधाºयांची कामे रोजगार हमी योजनेतून कशी घेता येतील याबाबत मार्गदर्शन केले होते. दरम्यान, गेल्या २६ मे २०१६ रोजी खारभूमी विकास विभागाने बोलावलेल्या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी खाजगी खारभूमी योजनांच्या दुरुस्तीवर शासकीय निधी खर्च करता येत नाही म्हणून खाजगी खारभूमी योजनांची दुरुस्ती होत नाही. ३७ वर्षात या खाजगी खारभूमी योजनांच्या दुरुस्तीवर शासनाच्या खारभूमी विकास विभागाने एकही पैसा खर्च केलेला नाही, त्यामुळे फुटणारे संरक्षक बंधारे ग्रामस्थांना आपली भातशेती आणि घरे वाचविण्याकरिता स्वखर्चाने व स्वकष्टाने सामूहिक श्रमदानातून बांधावे लागतात. मात्र हे काम राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून केल्यास ग्रामस्थांना त्यांच्याच गावात रोजगार मिळेल आणि संरक्षण बंधारे देखील बांधून होतील असा प्रस्ताव मांडला होता.कामे दृष्टिपथातया सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांची राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जॉबकार्ड करुन घेण्याचे निर्देष संबंधित विभागास दिले होते. श्रमिक मुक्ती दलाने या संदर्भात ग्रामस्थ शेतकºयांशी संवाद साधून ग्रामस्थांची जॉबकार्ड तयार झाली आणि रोजगार हमीतून संरक्षक बंधाºयांची कामे दृष्टिपथात आली होती.शासन निर्णयानुसार खारभूमी विकास विभागाची मंजुरीअलिबाग तालुक्यातील चरी-गोपचरी खारभूमी योजना आणि मोठे शहापूर खारभूमी योजना या दोन योजनांतील संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीची कामे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करण्याकरिता शासन निर्णय-मग्रारोहयो-२०१०/रोहयो-१० दि.८जून२०१० या शासन निर्णयानुसार खारभूमी विकास विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार चरी-गोपचरी खारभूमी योजनेच्या २२ लाख रुपयांच्या तर मोठे शहापूर खारभूमी योजनेच्या कामास २२ लाख ६३ हजार ५७० रुपयांच्या खर्च अंदाजपत्रकास मंजुरी २१ मार्च २०१८ रोजी देण्यात आली.६ लाख ६० हजार रुपये मजुरीचरी-गोपचरी खारभूमी योजनेतील संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीचे काम सुरु होवून ९० टक्के पूर्ण झाले आहे तर उर्वरित १० टक्के काम येत्या चार-पाच दिवसांत पूर्ण होणार आहे. मंजूर निधी २२ लाख रुपयांपैकी ४० टक्के रोजगार हमी मजुरी आणि ६० टक्के वाळूदगड व यंत्रसामग्री असे प्रमाण असल्याने २२ लाख रुपयांपैकी ४० टक्के म्हणजे सुमारे ६ लाख ६० हजार रुपये मजुरी काम केलेल्या जॉबकार्डधारक शेतकरी ग्रामस्थांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. योजनेच्या दुरुस्तीकरिता सरासरी १०० मजूर कार्यरत होते परिणामी एका शेतकºयास ६ हजार ६०० रुपये रोहयो मजुरी मिळणार आहे. हे काम १५ दिवस होते परिणामी एका मजुरास एक दिवसाची मजुरी किमान ४०० रुपये प्राप्त होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या किमान २००रुपये मजुरीपेक्षा ती अधिक असल्याने ग्रामस्थ शेतकºयांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.मोठे शहापूर खारभूमी योजनेकरिता निधी मंजूरमोठे शहापूर खारभूमी योजनेकरिता देखील २२ लाख ६३ हजार ५७० रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेला २१ मार्च २०१८ रोजी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असून संरक्षक बंधाºयांची कामे अल्पावधीत सुरु होत आहेत.मोठे शहापूर गावातील ४० ग्रामस्थांची ४० नवीन जॉबकार्ड तयार झाली असून उर्वरित कार्ड तयार करण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनीदिली आहे.अलिबागमध्ये १ हजार ५१५ तर पेणमध्ये ९९७ हेक्टर भातशेती होणार पुनर्प्रापितअलिबाग तालुक्यांतील चरी-गोपचरी आणि मोठापाडा शहापूर खारभूमी योजनेप्रमाणेच उर्वरित हाशिवरे, रांजणखार-मांडवखार, कालवड, खातीवरा आणि सांबरी या पाच तर पेण तालुक्यांतील बोरी,पांडापूर,कासू,डोलवी आदि एकूण सात खारभूमी योजनांची कामे देखील रोजगार हमीतून होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.च्या कामांच्या पूर्ततेअंती अलिबाग तालुक्यांत १ हजार ५१५ हेक्टर तर पेण तालुक्यांत ९९७ हेक्टर भातशेती पुनर्प्रापित होणार आहे,ही मोठी जमेची बाजू असल्याचे भगत यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या