शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जिल्ह्यात १० हजार ९४० शेतक-यांची कर्जमुक्ती; १९ कोटी ६१ लाख रुपयांची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:41 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ९४० शेतक-यांना १९ कोटी ६१ लाख ९ हजार ८४६ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ९४० शेतक-यांना १९ कोटी ६१ लाख ९ हजार ८४६ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.यात ९३४ शेतकरी हे कर्जमाफीअंतर्गत तर १० हजार शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तो शेतक-यांच्या कर्जखात्यात (कर्जमाफी) व बचत खात्यात (प्रोत्साहनपर) जमा करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांनी दिली आहे.शासनाकडून प्राप्त ग्रीन यादीनुसार, जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज घेतलेले ५४ शेतकरी होते. या शेतकºयांना एकूण २७ लाख १४ हजार ५४४ रु पयांचे कर्ज देण्यात आले होते, जे थकीत होते. तर नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन लाभ द्यायचा होता अशा शेतकºयांची संख्या ९७२३ इतकी असून त्यांना द्यावयाच्या लाभाची रक्कम १३ कोटी ५३ लाख १३ हजार ३०२ रु पये इतकी आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकूण ९७७७ शेतकºयांना १३ कोटी ८० लाख २७ हजार ८४६ रु पयांची रक्कम वितरित करण्यात आली. या रकमा बँकेने शेतकºयांच्या खात्यात जमा केल्या आहेत.राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जिल्ह्यात ८८० शेतकºयांना ५ कोटी २७ लाख १९ हजार रु पये इतक्या रकमेचे कर्ज देण्यात आले होते. हा लाभ शेतक-यांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आला आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणाºया २८३ शेतकºयांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ५३ लाख ६३ हजार रु पये देण्यात आले. ही रक्कम शेतकºयांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली असल्याचे खोडका यांनी सांगितले.३० जून २०१६ रोजीचे थकबाकीदार लाभास पात्रराज्य शासनाने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखरु पयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रु पयांवरील शेतकºयांना एक वेळ समझोता योजना लागू केली. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रु पयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते.२००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील त्यांनाही वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषित करण्यात आले होते. शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या रायगड जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांनी राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाइन माहिती भरून दिली होती. त्यानुसार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या रायगड जिल्ह्यातील ९हजार ७७७ शेतकºयांना तर राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदार १ हजार १६३ शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.कर्जमाफीची रक्कम खात्यात जमाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी१९ हजार कोटी रु पयांची रक्कम बँकांकडे वर्ग केली आहे.77लाख अर्ज या योजनेंतर्गत प्राप्त झाले. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करून ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.41लाख खात्यांमध्ये जवळपास कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रु पये इतका निधी हस्तांतरित केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी