शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

रायगड ठरणार आता प्राणवायू पुरवणारा जिल्हा; आरोग्य क्षेत्राला ८० टक्के पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:45 AM

रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागणार असल्याने रायगड जिल्हा हा प्राणवायू पुरवणारा जिल्हा ठरणार आहे.

- आविष्कार देसार्ईरायगड : अपुऱ्या आॅक्सिजनमुळे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. माणगाव तालुक्यामध्ये सुमारे २०० मेट्रिक टन क्षमतेचे आॅक्सिजन साठवणूक केंद्र उभारण्यात येणार आहे. रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागणार असल्याने रायगड जिल्हा हा प्राणवायू पुरवणारा जिल्हा ठरणार आहे.माणगाव येथे २०० मेट्रिक टन क्षमता असणारे आॅक्सिजन साठवणूक केंद्राला मंजुरी मिळाली आहे. कोकण विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत हिरवा कंदील दिला आहे. हे केंद्र उभारण्यात येत असल्याने आरोग्य यंत्रणेला आवश्यक असणाºया आॅक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यातून होणार आहे. सध्या तळोजा येथून आॅक्सिजनचा पुरवठा होत आहे.आरोग्य क्षेत्राला ८० टक्के, औद्योगिक क्षेत्राला २० टक्के आॅक्सिजनचा पुरवठाआधी औद्योगिक क्षेत्रासाठी ८० टक्के आणि आरोग्य क्षेत्रासाठी २० टक्के आॅक्सिजनचा पुरवठा केला जात होता. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे सरकारला आॅक्सिजनच्या गरजेमध्ये बदल करावे लागले आहेत. सरकारच्या नवीन नियमानुसार आरोग्य क्षेत्राला ८० टक्के आणि औद्योगिक क्षेत्राला २० टक्के आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची घोषणा काहीच दिवसांपूर्वी केली आहे.रायगड जिल्ह्यातील सातत्याने वाढत्या आॅक्सिजनची गरज लक्षात घेत माणगाव येथे आॅक्सिजन साठवणूक केंद्र उभारण्यात येणार आहे. कोकण आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आॅक्सिजन साठवणूक केंद्र जिल्ह्यासाठी खूपच चांगले ठरणार आहे.- निधी चौधरी, जिल्हाधिकारीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आॅक्सिजनची गरज सातत्याने भासत आहे. जिल्ह्यातच आॅक्सिजनचे केंद्र निर्माण होत असल्याने जिल्ह्याच्या हिताचे आहे. सुमारे २०० मेट्रिक टन आॅक्सिजन साठवण्यात येणार असल्याने रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल.- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस