शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

Raigad Landslides: बचावकार्यात कुणाचा हात सापडताेय, तर कोणाचे धड; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 07:53 IST

मृतदेह न शोधण्याची ग्रामस्थांची विनंती; आतापर्यंत ४९ मृतदेह सापडले

ठळक मुद्देसरकारी मदत, अन्य लाभ मिळण्यासाठी मृतदेह मिळणे आणि त्यांची ओळख पटणे गरजेचे आहेचमत्कार होऊन एखादा माणूस जिवंत सापडला तर, त्याचा जीव वाचू शकतोढिगाऱ्याखालून कोणाचे हात तर कोणाचे पाय मिळत आहेत, त्यामुळे बचाव कार्य थांबवा

आविष्कार देसाईरायगड : तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पण नातेवाईकांनी बचाव कार्य थांबवा, असे संमतीपत्र लिहून दिल्यास बचाव कार्य थांबविले जाईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. आतापर्यंत ४९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर दिवसभरात ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर ३६ जण अजून बेपत्ता आहेत.

बचाव कार्यादरम्यान मृतदेहाची अवहेलना पाहवत नाही. त्यामुळे यापुढे बचाव कार्य थांबविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आतापर्यंत ८५ जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. त्यामुळे बचावकार्य सुरूच राहणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले होते. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात होते. सायंकाळी चौधरी बचावकार्य सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मृतदेहांची अवहेलना पाहवत नाही, ढिगाऱ्याखालून कोणाचे हात तर कोणाचे पाय मिळत आहेत, त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

सरकारी मदत, अन्य लाभ मिळण्यासाठी मृतदेह मिळणे आणि त्यांची ओळख पटणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे. चमत्कार होऊन एखादा माणूस जिवंत सापडला तर, त्याचा जीव वाचू शकतो, असे चौधरी यांनी सांगितले. त्यानंतर स्थानिक आमदार भरत गोगावले तेथे आले. त्यांनीही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाला संमतीपत्र दिले. तर बचावकार्य उद्यापासून थांबविले जाईल, असे चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलन