शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

आधार कार्डसाठी नागरिकांच्या रांगा कायम; शासनाच्या डिजिटल सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:41 PM

ग्रामीण भागातील ई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र बंदच

दासगाव : विविध दाखले आणि शासकीय लाभासाठी लागणाऱ्या आधार कार्डसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र कुचकामी ठरले तर मुबलक आधार केंद्रांमुळे नागरिकांना रांगाच रांगा लावाव्या लागत आहेत. आधार कार्ड लवकर मिळावे म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना पहाटेच शहरात येऊन आधारसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.

विविध शासकीय दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड गरजेचे आहे. नागरिक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्त्वपूर्ण असल्याने गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड काढणे बंधनकारक झाले आहे. सुरुवातीस नागरिकांनी काढलेल्या आधार कार्डमध्ये अनेक चुका झाल्या आहेत. यामध्ये स्पेलिंग दुरुस्ती, जन्मतारीख बदल, सदोष छायाचित्रामुळे अनेक नागरिकांना शासकीय दाखले मिळण्यात आणि शासकीय योजनांचा लाभ घेताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अशा दुरुस्तीसाठी आता गर्दी वाढू लागली आहे. त्यातच प्रत्येक विद्यार्थी, बालक यांनादेखील शालेय पोषण आहार, शिष्यवृत्तीकरिता आधार महत्त्वाचे आहे. विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील आधारसाठी धावपळ करावी लागत आहे.

महाड तालुक्यात केंद्र शासनाच्या भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने महाडमध्ये बँक ऑफ इंडिया, महाड पोस्ट कार्यालय, महाड नगरपालिका आणि अन्य एक खाजगी अशी फक्त चार केंद्रे अस्तित्वात आहेत. यातील पोस्ट कार्यालयात ठरावीक दिवशीच आधारबाबत काम केले जाते. बँक ऑफ इंडिया या ठिकाणीदेखील अर्ज मिळत नसल्याने नागरिकांना धावपळ करावी लागते. यामुळे महाड नगरपालिकेच्या आधार केंद्रावर नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. या ठिकाणी संपूर्ण महाड तालुक्यातून नागरिक आधारसाठी येत असल्याने अनेकांना वेळ आणि इंटरनेटच्या खंडित सुविधेमुळे अनेक वेळा परत जावे लागते. तर अनेकांना परत जावे लागू नये म्हणून पहाटे चार वाजता रांगेत उभे राहावे लागत आहे. 

महाड तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महाऑनलाइन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई सेवा केंद्रांची संख्या जवळपास ६० आहे. मात्र, ई सेवा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणा केला तरी प्रशासकीय पातळीवर कामे होत नसल्याचे समोर आल्याने अनेक जण एजंटचा आधार घेतात. महाड तालुक्यात केंद्र शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटने जोडण्यासाठी दूरसंचार विभागाकडून जोडणी करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात दूरध्वनी सेवा ठप्प आहे तर अनेक गावांत आजही मोबाइल सेवा मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयात बसविण्यात आलेली इंटरनेट यंत्रणा धूळखात पडून आहे. यामुळे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले संग्राम केंद्रदेखील ठप्प आहे. ग्रामीण भागात आधारसह अन्य दाखले गावातच मिळावेत म्हणून संग्राम केंद्र आणि ई सेवा केंद्र सुरू झाले खरे मात्र हा उद्देश अद्याप साध्य झालेला नाही.

टॅग्स :digitalडिजिटलAdhar Cardआधार कार्ड