शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, शु्द्ध पाण्याच्या नावाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 6:41 AM

पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत.

- मयूर तांबडेपनवेल - पाण्याच्या टंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकांना देखील सतावत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील समारंभ, लग्न आदी कार्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे जार वापरले जात आहेत. कॅनविक्रे ते मिनरल वॉटर असल्याच्या नावावर केवळ थंड पाणी ग्राहकांना पुरवीत आहेत. कॅनमधून व बंद बॉटलमधून पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी होऊन फसवणूक करणाºयांवर कारवाईची गरज आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. तर शहरी भागात वेगवेगळ्या प्रकारचे पाणी येत असल्याने आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरिक बाटलीबंद तसेच पाण्याचे जार पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास वापरत आहेत. जारचे पाणी दीड रु पया लिटर तर बाटलीतील पाणी पंधरा ते वीस रु पये लिटर या दराने नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे. पनवेल परिसरात सुमारे पाच ते दहा लाख रु पये खर्च करून कूपनलिकेद्वारे पाणी घेऊन मशिनच्या साहाय्याने पाणी स्वच्छ करून विकण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. सध्या लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात होत असून, प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या कॅन दिसून येतात. परंतु, हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.युव्ही स्टरीलायझेशन, सूक्ष्म गाळणी व ओझोनायझेशन आदी प्रक्रि या करूनच पाणी कॅनद्वारे नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु, मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल परिसरात पाण्याचे दहा ते पंधरा कारखाने आहेत. त्यावर अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या माध्यमाद्वारे कॅनमधील पाण्याची चाचणी व शहानिशा होत नसल्याची तक्र ार करण्यात येत आहे. मात्र, प्रशासन याची दखल घेत नसल्याचा आरोप होत आहे.पनवेल परिसरात अनेक अनधिकृत बाटलीबंद पाण्याचे वितरक असल्याने अशा वितरकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील छोट्या-मोठ्या कार्यालयापासून अनेक घरांपर्यंतही या जारच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ब्युरो आॅफ इंडियन स्टॅण्डर्डची परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाची परवानगी असणेही गरजेचे आहे, तरच या परवानग्या असलेला वितरकच बाटलीबंद पाण्याची विक्री करू शकतो. नागरिकांना अशुद्ध पाणी विकून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाºयाविरोधात अन्न, औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली जात आहे.बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांचे सॅम्प्लिंग केले जाते. पाण्यासंदर्भात तक्र ारी आलेल्या नाहीत. नागरिकांची तक्र ार आली की आम्ही पाण्याचे सॅम्प्लिंग करून कारवाई करतो.- डी. संगत,सहायक आयुक्त,अन्न, औषध प्रशासन विभाग,पेण 

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या