शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

श्रीवर्धनमध्ये विकासाला जनतेचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 23:48 IST

महाआघाडीचा झाला विजय; सुनील तटकरेंसाठी होती प्रतिष्ठेची लढाई

- संतोष सापतेश्रीवर्धन : प्रत्येक निवडणुकीत सत्तासंघर्ष जनता अनुभवत असते. प्रचाराचा उडणारा धुराळा विविध बाबी व मतमतांतरांची निर्मिती करतो. वातावरण निर्मितीद्वारे राजकीय पक्ष आपली भूमिका जनतेसमोर मांडतात. यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीने जनतेचा कौल विकासाला असल्याचा प्रत्यय आला आहे. श्रीवर्धन मतदारसंघात महाराष्ट्रात सत्तास्थानी हिस्सेदार असलेल्या शिवसेनेची टक्कर राष्ट्रवादी काँग्रेसशी होती.

देशात मोदीलाटेची त्सुनामी असताना आपली नौका अगदी सहजपणे संसद भवनाच्या प्रांगणात घेऊन जाणारे खासदार सुनील तटकरे रायगड नव्हे तर कोकणच्या राजकारणातील मोठे प्रस्थ मानले जाते. अदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या असल्याने विधानसभा निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील तरुण नेतृत्व व सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय अशी ओळख अदिती यांनी रायगडच्या राजकारणात निर्माण केली आहे. मृदू भाषा, कार्यकर्त्यांशी जवळीक, मतदारांशी थेट संवाद व वडिलांचा वैचारिक कृतिशीलतेचा वारसा अदिती तटकरे यांच्या विजयात महत्त्वाचा ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ पासून मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांना जनतेसमोर ठेवण्यात पक्ष कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत. शिवसेनेने विनोद घोसाळकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात पुनश्च एकदा कार्यकर्ता संघटित केला होता; मात्र त्याला दिशादर्शक मार्गदर्शकाची उणीव भासली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सर्वत्र प्रचारात उतरले; परंतु नियोजन व राजकीय गणिते चुकली.

अपक्ष उमेदवारांना बळ पुरवण्याचे प्रयत्न शिवसेनेने केले, किंबहुना अप्रत्यक्ष बळ पुरवले. मात्र, अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेचा भ्रमनिरास केल्याचे निवडणूक निकालात दिसले आहे. काँग्रेस पक्षाच्या बंडखोरांनी उणेपुरे अडीच हजार मतांचासुद्धा पल्ला गाठला नाही. त्याची परिणती शिवसेनेचे मताच्या आकड्यांचे गणित चुकले ते पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत चुकतच गेले.

मूलभूत प्रश्नांच्या मुद्द्यांना प्राधान्य

या वर्षीच्या लोकसभा व विधानसभेने सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील वर्चस्वाची चुणूक सर्वांना दाखवली आहे. या वर्षीच्या विधानसभेत सर्वात प्रभावी मुद्दा सुनील तटकरे यांचे राजकीय नेतृत्व हा आहे. कारण या विधानसभेला त्यांना सर्व बाजूने घेरण्यात विरोधक यशस्वी झाले होते. मात्र, आपल्या वेगळ्या शैलीने तटकरे यांनी सर्वांना धोबीपछाड दिली आहे.

विकास या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांकडे मते मागितली. आपण गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचे सेवापुस्तक जनतेच्या समोर ठेवले. तर दुसरीकडे शिवसेना आपण विकासकामे करू, असे सांगत जनतेची मते मागत होती. पर्यटन व रोजगार हे विषय सर्व राजकीय पक्षांनी आपल्या अजेंड्यावर ठेवले होते. त्याचसोबत वैद्यकीय सेवा, जनतेच्या मूलभूत गरजा या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले.

नगरपालिका व पंचायत समिती

श्रीवर्धन, म्हसळा, रोहा या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, तर श्रीवर्धन पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, विधानसभा निवडणूक ही नगरपालिका व पंचायत समिती यांच्या निवडणुकीपेक्षा भिन्न आहे, त्याचा प्रभाव विधानसभेवर क्विचित पडला, असे निदर्शनास आले आहे.

युती व आघाडी यांच्यात पडद्यामागे गडबड झाल्याची चर्चा आहे. आघाडीतील बंडखोर उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते, तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी युती धर्माचे पालन केले नाही.या कारणास्तव वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याचे समजते. मतदारसंघात अनेक दिग्गजांनी जाहीर सभा घेतल्या. मात्र, त्याचा प्रभाव मतदारांवर झालेला दिसत नाही. जनतेने आपल्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणाºया पक्षाला मत दिल्याचे दिसून आले आहे.

संघटनात्मक कामगिरी

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची रचना अतिशय संघटनात्मकरीत्या केली होती, त्यामुळे आजही शाखाप्रमुख ते आमदार कामाची विभागणी निदर्शनास येते. या निवडणुकीत मुंबईस्थित विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची स्थानिक पातळीवर काम करणाºया कार्यकर्त्यांच्या क्षमता व मर्यादा ओळखण्यात काही अंशी अपयश आल्याचे दिसते.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यकर्त्यांची क्षमता ओळखून कामगिरी सोपवली होती. योग्य मार्गदर्शन, अचूक माहिती व अंदाज, यथार्थ व्यूहरचना व जनतेशी थेट संवाद या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली आहे.

जाती-धर्मापेक्षा विकासाला चालनाश्रीवर्धन मतदारसंघात मुस्लीम व कुणबी हे निर्णायक ठरणारे घटक आहेत. ही व्होट बँक ठरावीक पक्षाची मानली जाते. मात्र, या वर्षी सर्व चित्र पालटले होते. मतदारसंघातील अनेक भागात मुस्लीम समाजातील तरुणाईने शिवसेनेत प्रवेश केला तर अनेक कुणबी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे नेपथ्य केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019shrivardhan-acश्रीवर्धनNCPराष्ट्रवादी काँग्रेस