शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

‘बेशिस्त पार्किंग’ची समस्या गंभीर, बिघडते आहे सामाजिक स्वास्थ्य, अनेक ठिकाणी होतेय वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 04:39 IST

सामाजिक समस्या स्थानिक स्वराज्य संस्था वा स्थानिक प्रशासनाने दूर केल्याच पाहिजेत असा अट्टाहास आणि आग्रह जनसामान्यांचा असतो, परंतु सामाजिक समस्या निर्मितीस आपणही एक कारण बनतो आहेत, याचा मात्र सोईस्कररीत्या विसर पडतो.

- जयंत धुळपअलिबाग : सामाजिक समस्या स्थानिक स्वराज्य संस्था वा स्थानिक प्रशासनाने दूर केल्याच पाहिजेत असा अट्टाहास आणि आग्रह जनसामान्यांचा असतो, परंतु सामाजिक समस्या निर्मितीस आपणही एक कारण बनतो आहेत, याचा मात्र सोईस्कररीत्या विसर पडतो आणि अल्पावधीतच ती एक गंभीर सामाजिक समस्या बनते. याचा प्रत्यय सध्या जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्यालाच बाधा ठरत असलेल्या बेशिस्त ‘वाहन पार्किंग’ या समस्येतून सर्वांना येत आहे.शहरातील विशेषत: नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणाकरिता त्या रस्त्यांवर राहणाºया नागरिकांनी आपल्या नव्या इमारती बांधताना, नव्या शहर विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणाकरिता जागा देखील दिली. परंतु या रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर २४ तास चारचाकी वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात. परिणामी रस्ता रुंदीकरण करून देखील त्यापैकी ५० टक्के रस्ता कायमस्वरूपी या बेदरकार पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे अडून राहिलेला असतो. याबाबत वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला तर बेदरकार वाहन पार्किंग करणाºयांकडून मोठी नाराजी व्यक्त होते, तर रस्त्यावर यामुळे वाहतूककोंडीचा सतत त्रास होत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणारे वाहन चालक ‘वाहतूक पोलीस झोपले आहे का’ असा प्रश्न उपस्थित करुन वाहतूक पोलिसांनाच जबाबदार धरतात, अशी व्यथा एका वाहतूक पोलिसानेच ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त के ली.वाहन पार्किंग करताना दुसºयाला त्रास होणार नाही, याचा विचारच वाहन चालक करीत नाहीत. शहरातील निवासी सोसायट्या प्रवेशद्वारांवर ठळक अक्षरात ‘प्रवेशद्वारासमोर वाहने पार्किंग करू नये’ अशा सूचना लिहिलेल्या आहेत. त्या वाचूनही त्याच प्रवेशव्दारासमोर वाहने पार्क करण्याची मानसिकता क्लेशदायी असल्याचे एका निवासी वसाहतीत राहाणाºया ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. प्रवेशद्वारासमोर वाहन पार्क करू नका, आम्हाला जा-ये करण्यास अडचण होते, अशी विनंती केली असता, वाहन चालक प्रतिप्रश्न करतात, ‘मग आम्ही आमची गाडी कुठे पार्क करायची’ आणि येथे अनेकदा मोठा वाद होत असल्याचे त्यांनी सांगितले.शहरात सर्वसाधारणपणे बँकांच्या समोर मोठ्या प्रमाणात बेदरकार पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि त्यातून उद्भवणारे वादाचे प्रसंग हे नित्याचेच झाले आहे. ही सारी परिस्थिती टाळण्याकरिता बँकेने आपला एक कर्मचारी जर हे वाहतूक व्यवस्थापन करण्याकरिता तैनात केला तर हा प्रश्न सुटू शकतो. परंतु कोणतीही बँक याचा विचारच करीत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक महिलांनी दिली आहे. मोठी दुकाने आणि हॉटेल्स यांच्या समोर रस्त्यांवरच अस्ताव्यस्त आणि बेदरकार पार्किंग असते. त्यांच्याकडे आलेल्या गिºहाईकांचीच ही वाहने असतात. त्यांचा व्यवसाय देखील त्यातून वाढत असतो, अशा वेळी त्या दुकान मालकांनी वा हॉटेल व्यावसायिकांनी आपला एक कर्मचारी नेमून गाड्यांचे पार्किंग व्यवस्थित होईल याची काळजी घेतली तर वाहतूक कोेंडी होणार नाही, परंतु हे कुठेही होत नसल्याने समस्या आणि त्या निमित्ताने वाद सर्वत्र वाढत आहेत, अशी परिस्थिती एका व्यावसायिकानेच मांडली आहे.बेशिस्त पार्किंग ठरतोय वादाचा विषयमुळात बेदरकारपणे बेशिस्त पार्किंग करून ठेवलेल्या मोटारसायकल आणि स्कूटर्सवर बसून गप्पा मारणारे हा एक मोठा वादाचा विषय सर्वत्र दिसून येतो.ज्याची मोटारसायकल वा स्कूटर असते तो माणूस आपले काम आटोपून आला की त्याचा हमखास त्याच्या गाडीवर बसलेल्या माणसाबरोबर मोठा वाद होतो, प्रसंगी मारामाºया देखील झाल्या आहेत.परंतु मुळात बेदरकार पार्किंग करणारे आणि त्यांच्या गाड्यांवर बसून गप्पा मारणारे या दोघांच्याही हे लक्षात येत नाही की आपण दोघेही चुकीचे वागतो आहेत. या मानसिकतेवर कोणी उपाय काढायचा असा सवाल या निमित्ताने एका सरकारी अधिकाºयांनीच केला आहे.वाहन मालकांची स्वयंशिस्त हाच उपाय१वाहतूककोंडीची समस्या,बेदरकार पार्किंग ही एक सामाजिक समस्या बनली आहे, हे वास्तव आहे. परंतु यावर उपाय केवळ पोलीस आणि कायदा हा असू शकत नाही. वाहन मालकांची स्वयंशिस्त यातूनच ही समस्या सुटू शकते आणि त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याची अपेक्षा अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.रुग्णवाहिका देखील ताटकळतात२अलिबागमधील सरकारी रुग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व ठिकाणची सरकारी रुग्णालये येथील पार्किंगची समस्या मोठी गंभीर आहे. या रुग्णालयाच्या मार्गावर अस्ताव्यस्त पार्किंग करुन ठेवलेल्या वाहनांमुळे आजारी वा अपघातग्रस्त रुग्णाला रुग्णालयात घेवून जाणाºया रुग्णवाहिकांना रस्त्यात ताटकळत थांबावे लागते, यासारखी दुसरी असंवेदनशीलता नाही अशी समस्या एका सरकारी वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितली. रस्त्यातील वाहन बाजूला करा, रुग्णवाहिकेत रुग्ण आहे, त्याला रुग्णालयात नेण्यात येत आहे, असे सांगणाºया रुग्णवाहिका चालक आणि त्याचा सहकारी यांना मारहाण झाल्याचे प्रकार देखील जिल्ह्यात घडले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड