शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अलिबाग परिसरात पेपर इंडस्ट्री उभारण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:14 PM

बहुराष्ट्रीय कंपनी : आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

आविष्कार देसार्ई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारी पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे. यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या अथवा देशपातळीवरील कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी आली तरी जिल्ह्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे, असे मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मात्र, आधीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच नव्याने भूसंपादन करा, असा सूर स्थानिक पातळीवर आळवला जात असल्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेला विरोध होणार असल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये एमआयडीसीमार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सुमारे एक हजार ३०० एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या परिसरामध्ये नेमका कोणता उद्योग उभारण्यात येणार आहे. याची माहिती स्थानिकांसह शेतकऱ्यांना नाही. प्रकल्प कोणता येणार आहे याचीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी जमिनी कशा काय द्यायच्या, असा सवाल येथील ग्रामस्थ परशुराम म्हात्रे यांनी केला आहे. एमआयडीसीने याआधीच टाटा पॉवर प्रकल्पासाठी सुमारे एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन केले आहे. प्रकल्प येण्याआधी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रकल्पच झाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पार धुळीला मिळाल्या आहेत. त्यामुळे आधी प्रकल्पग्रस्तांना दिलेली लेखी आश्वासने पूर्ण करा, त्यानंतरच नवीन संपादनास सुरुवात करा, अन्यथा भाजपकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये १०२ एकर परिसरामध्ये शेततलावांची निर्मिती केली आहे. त्या शेततळ्यांवर स्थानिकांचा रोजगार अवलंबून असल्याने सरकारने हा १०२ एकरमधील शेततळ्यांचा परिसर वगळून अन्य ठिकाणी कोणताही पर्यावरण पोषक प्रकल्प आणावा. त्याला आमचा विरोध नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या सुट्टीवर असल्याचे सांगितले.जिल्ह्याच्या विकासासाठी होणार?च्जिल्ह्याच्या विकासासाठी अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे.च्याआधी रायगडमधील शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत गीते यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रत्येकी तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.च्पुढे त्यांची ही घोषणा हवेतच विरली होती. आता नवनिर्वाचित खासदांरानी अलिबागमध्ये पेपर इंडस्ट्री उभारण्याचे जाहीर केल्याने या ठिकाणी खरेच उद्योग उभा राहणार का? हा खरा प्रश्न आहे.इंडोनेशियन कंपनी असल्याची चर्चाच्अलिबाग तालुक्यामध्ये इंडोनेशियन कंपनी आपले हात-पाय रोवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी शहापूर-धेरंड परिसरामध्ये एका बड्या गुंतवणूकदाराने भेट दिल्याचे बोलले जाते. दिल्लीमधूनच या ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानेच या गुंतवणूकदारासोबत वरिष्ठ प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी उपस्थित होते, अशीही चर्चा आहे.